Home चंद्रपूर आ. सुधिर मुनगंटिवार यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्याची घोषणा.अपघातातील त्या मृतांच्या कुटुबियांना प्रत्येकी 5...

आ. सुधिर मुनगंटिवार यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्याची घोषणा.अपघातातील त्या मृतांच्या कुटुबियांना प्रत्येकी 5 लाखाची आर्थिक मदत जाहीर।

128
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220521-WA0023.jpg

आ. सुधिर मुनगंटिवार यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्याची घोषणा.अपघातातील त्या मृतांच्या कुटुबियांना प्रत्येकी 5 लाखाची आर्थिक मदत जाहीर।
चद्रपुर/गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): चद्रपुर-मुल महामार्गावर अजयपुर येथे झालेल्या डिझेल टॅंकर व लाकडाने भरलेल्या ट्रक यांच्यात झालेल्या भिषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य मुख्यमंञी सहाय्यता निधितून देण्याची मागणी माजी अर्थमंञी आ.सुधिर मुनगंटिवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती.आ.मुनगंटिवार यांच्या मागणीच्या अनुषंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निधितुन मृतकांच्या कुंटुबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहायक देण्याची घोषणा केली आहे.
अजयपुर गावाजवळ झालेल्या भिषण अपघातादरम्यान मोठी आग लावुन 9 मजुरांना भाजुन मृत्यू झाला होता.या अपघातानंतर आ.सुधिर मुनगंटिवार यांनी मुख्यमंत्र्यांना पञ पाठवुन मुख्यमंत्री निधितुन मृतकांच्या कुंटुबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहायक देण्याची मागणी केली होती.मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव श्री विकास खारगे यांच्याशी याबाबत चार्च देखील केली.जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट गेत आ.सुधीर मुनगंटिवार यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव शासनाला पाठविण्याची विनंती केली.आ.मुनगंटिवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मृत्यकांच्या कुटूबियांना मुख्यमंत्री सहाय्यक निधितून प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहायक देण्याची घोषणा केलेली आहे.

Previous articleअनसिंग येथे सेंट्रल बँकमध्ये सुविधा चा अभाव
Next articleभटके-विमुक्त जातीच्या विविध मागण्या संदर्भात खा.अशोकजी नेते,यांच्याशी चर्चाकरून निवेदन देण्यात आले।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here