Home गडचिरोली जनतेचे हित लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे आमदार डॉक्टर देवरावजी...

जनतेचे हित लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा

60
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220429-WA0046.jpg

जनतेचे हित लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा                         गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिल्हा परिषद शाळा गडचिरोली येथे आयोजीत वार्षिक आमसभेत आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वार्षिक आमसभेला अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

आमसभेच्या सुरुवातीला शिक्षण ,आरोग्य ,कृषि , एम.आर.ई.जी.एस अंतर्गत चांगले काम करणाऱ्या काम कर्मचाऱ्यांचा व प्रतीनिधिंचा सत्कार

 

लहान लहान कामासाठी आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना नाहक त्रास न देता त्यांच्याशी प्रेमाने व सहकार्याने वागून त्यांच्या हितासाठी प्रथम प्राधान्य देऊन काम करावे असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे आयोजित पंचायत समितीच्या आढावा सभेमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
यावेळी मंचावर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासजी दशमुखे ,संवर्ग विकास अधिकारी मोहर , पंचायत समिती माजी सदस्य तथा भाजपा तालुका अध्यक्ष रामरतन गोहने, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य साखरेताई, माजी पंचायत समिती सदस्य गावतुरे तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते

आमसभेच्या सुरुवातीला शिक्षण ,आरोग्य ,कृषि , एम.आर.ई.जी.एस इत्यादी विभागांतर्गत चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व प्रतीनिधिंचा सत्कार आमदार डॉ देवरावजी होळी व मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला

आमसभेमध्ये अनेक स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली. एम. एस. ई. बी. ला सन २०१८ पासून शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही त्यांना अजून पर्यंत कृषी पंपाचे कनेक्शन वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. तालुक्यातील अनेकांचे वन हक्काचे पट्टे प्रलंबित असून त्याचाही निर्णय अजून पर्यंत झालेला नाही. घरकुल मंजूरी बाबत असलेल्या अडचणी , घरकूल मंजुर झाल्यावर रद्द होणे यासारख्या समस्यांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून राज्य शासनाविषयी प्रचंड चीड निर्माण झाली असल्याचे या सभेदरम्यान दिसून आले. तसेच अनेक विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरणं लक्षात आल्याने त्यांच्या चौकशीचे आदेशही यावेळी देण्यात आले. पंचायत,कृषी, बांधकाम, रस्ते विकास एम एस ई .बी.इत्यादी विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी तातडीने अशा समस्यांकडे लक्ष देऊन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्याने काम करावे स्थानिक लोकांना अकारण कार्यालयात फेऱ्या मारण्यास भाग पाडू नये त्यांना अकारण त्रास देऊ नये असे निर्देश त्यांनी या सभेच्या दरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.या सभेला अधिकारी , कर्मचारी, लोकप्रिनिधीनी यांचेसह स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.

Previous articleओबीसींनी भोंगे लावणे, काढण्याच्या भानगडीत पडू नये – पंकज खोबे
Next article!!गडचिरोली जील्हाच्या विकासासाठी व जवानांच्या पाठिशी संपुर्ण . !! उपमुख्यमंञी अजीत पवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here