राजेंद्र पाटील राऊत
आदिवासींचे वाढते धर्मातरन रोखण्यासाठी भारत सरकारला कलम 342 मध्ये कलम 341 सारखी सुदारना करावीच लागेल।
प्रकाश गेडाम गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
नाशीक जिल्यात 5 हजार आदिवासी नी धर्मातरन रोखण्याचा केला संकल्प
केन्द्रिय आरोग्य राज्य मंत्री डाॅ भारतीताई पवार यांची उपस्थिती
भारतीय संविधान मध्ये कलम 341प्रमाणे आरक्षण घेणारे अनुसूचित जाती/SC चा व्यक्ती धर्मातरन करुन ख्रिश्चन किंवा मुस्लिम झाला तर त्यांचे एस सी चे आरक्षण बंद होते.मात्र कलम 342 प्रमाणे आदिवासी व्यक्ती धर्मातरन करुन मुस्लिम, ख्रिश्चन झाला तर त्यांचे एस.टि/आदिवासी चे आरक्षण बंद होत नाहि.संविधान कलम 342 मध्ये 341 सारख्या तरतुदिचा अभाव व तात्कालिन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यानी ख्रिश्चन मशनरीच्या दबावात 1969 च्या संयुक्त संसदिय समीतीच्या व 348 खासदारांच्या निवेदना कडे केलेले दुर्लक्ष या चुकान मुडे 80 लाख ख्रिश्चन व 12 लाख मुस्लिम धर्मातरीत आदिवासी आहेत.डाॅ बाबु कार्तिकरावजी उराव यांच्या 29 ऑक्टोबंर या जंयती दिना पासुन जनजाती सुरक्षा मंच देशातील 288 आदिवासी बहुल जिल्हात व 14 राज्यान मध्ये अशी भव्य आदिवासी सम्मेलन घेउन धर्मातरीत आदिवासी ना आदिवासी यादीतून डीलिस्टिंग करा.व बोगस आदिवासी ना खाली करुन ख-या आदिवासी ना न्याय द्या या मागणी करीता आदिवासी सम्मेलनात पारीत ठराव मा.राष्ट्रपती जी मा.प्रधानमंत्री जी व मा.राज्यपाल जी याना पाठवुन कलम 342 मध्ये दूरस्ती करन्यास भारत सरकारला भाग पाडुन देशातील 12 करोड जनजाती/आदिवासी ना न्याय देउ तेव्हाच स्वस्त बसु असे आवाहन प्रकाश गेडाम,प्रांत संयोजक जनजाती चेतना परिषद विदर्भ तथा डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र महाराष्ट्र यानी नाशीक जिल्ह्यातील जनजाती सुरक्षा मंच यांच्या वतीने आयोजित भव्य आदिवासी सम्मेलनात प्रमुख वक्ता म्हनुन व्यक्त केले
धर्मातरन केल्याने आदिवासी ची भव्य दिव्य संस्कृती,पंरपरा,रीतिरिवाज,पुजा व लग्न पध्दती नष्ट होते.342 मध्ये सुधारणा करण्यासाठी लोकसभा सभागृहात या करीता 1969 च्या संयुक्त संसदिय समीतीच्या शिफारशी वर चर्चा करन्या करीता प्रयत्न करनार असल्याने मा.ना.डाॅ.भारतीताई पवार केन्द्रिय आरोग्य राज्य मंत्री,भारत सरकार यानी या वेळी व्यक्त केले.जनजाती गौरवदिवस घोषीत करुन आदिवासी समाजाला न्याय देनारे मा.प्रधानमंत्री 342 मध्ये दूरस्ती करतील असा आशावाद व्यक्त केला
5 ते 7 हजारच्या संख्येने उपस्थित आदिवासी बांधवांना यावेळी प.पु.महंत वैध्यराज देवबाप्पा महाराज व प.पु.डाॅ.(पिएचडी)रमणगीरी महाराज यांची प्रबोधनपर भाषणे झालीत