Home नांदेड खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या कृषि निविष्ठा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात –...

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या कृषि निविष्ठा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

49
0

राजेंद्र पाटील राऊत

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या कृषि निविष्ठा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड :– येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषि विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात अनधिकृत बियाणे, रासायनिक खते व किटक नाशके यांची विक्री होत असल्यास संबंधित विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कृषि विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, रेल्वे डिसीएम जय पाटील, पोलीस उप अधिक्षक डॉ.आश्विनी जगताप, कृषि विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमणशेट्टे, महाबीज जिल्हा प्रतिनिधी, एमएआयडीसी जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा पणन अधिकारी प्रतिनिधी, सहाय्यक कामगार आयुक्त सय्यद, कृषि विक्रेते यांचे प्रतिनिधी व रेल्वे रॅक वाहतुकदार, माथाडी कामगार संघटना प्रतिनिधी मुनेश्वर, मोहिम अधिकारी जी.एन.हुंडेकर, कृषि अधिकारी पी.आर. माने, व्ही.एस.निरडे, खत पुरवठादार कंपनी, बियाणे पुरवठादार कंपन्याचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

रेल्वे, वाहतुकदार, माथाडी कामगार अधिकारी यांनी रासायनिक खताच्या वितरणास रेल्वे निर्बंधामूळे अडचण येणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच 100 टक्के अनुदानित खत विक्री ई-पॉश मशिनद्वारेच करुन खताची पोहोच 24 तासाच्या आत झाली पाहिजे. आवंटनानुसार खत कंपनीचे प्रतिनिधीनी खते उपलब्ध करुन द्यावीत. जिल्ह्यातील तालुकानिहाय पुरवठा कृषि विभागाकडून मंजूर करुन घ्यावा. बियाणे हे सहज व रास्त दरात उपलब्ध व्हावेत यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यात मान्यताप्राप्त नसलेले एचटी -बीटी बियाणे विक्री होणार नाही यांची दक्षता घेतली पाहिजे. जिल्ह्यात रासायनिक खताचे नियोजन करण्यासाठी कृषि सेवा केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधिताना दिल्या.

यावेळी खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, रासायनिक खते व संभाव्य अडचणी/नियोजन यांचे सादरीकरण कृषि विकास अधिकारी चिमणशेट्टे यांनी केले. खरीप हंगामासाठी 7 लाख 56 हजार 200 हे. क्षेत्र खरीप पिकासाठी प्रस्तावित असून त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र 4 लाख 40 हजार हे. सोयाबीन पिकाखाली प्रस्तावित आहे. घरचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे खरीप अपेक्षित सोयाबिन पेरणीसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. सोयाबीन क्षेत्रासाठी 1 लाख 15 हजार क्विंटल बियाणे मागणी नोंदविलेली आहे. यानुसार सोयाबीन बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यास सर्व खताची मिळून 2 लाख 11 हजार 110 मे. टन खताचे आवंटन मंजूर आहे. युरिखताचे 66 हजार 160 मे. टन, डीएपी खताचे 38 हजार 980 मे. टन, एम.ओ.पी.खताचे 18 हजार 390 मे. टन, एस.एस.पी.खताचे 25 हजार 650 मे. टन , एन.पी.के.एस.खताचे 61 हजार 930 मे. टन खताचे आवंटन मंजूर आहे. जिल्ह्यास युरिया 4 हजार 350 मे. टन व डीएपी 3 हजार 590 मे. टन बफर स्टॉक खरीप हंगामासाठी नोडल एजन्सी म्हणून एम.ए.आय.डी आहे. खरीप नियोजनाच्या दृष्टीने जिल्हास्तरावर 1 व तालुका स्तरावर 16 असे एकूण 17 भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यास बफर स्टॉकसाठी नेमणूक केलेल्या नोडल मार्कफेड व एमए आयडीसी एजन्सीच्या साठवणूक गोडाऊनला या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Previous articleउपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे मोफत आरोग्य मेळावा संपन्न.
Next articleचि. पार्थ लवकुश भोजने २रा वाढदिवस साजरा करण्यात आला भोजने परिवाराकडून
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here