राजेंद्र पाटील राऊत
महावितरण कंपनीचा भोगळ कारर्यामुळे तीन ते चार दिवस देगाव अंधारात पाण्यासाठी भटकंती
नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)
नायगाव तालुक्यातील देगाव येथे तीन ते चार दिवस झाले अंधारात आहे .नवीन आलेले इंजिनीयर दुधमल व देगावला दोन लाईन मेन कारताळे व भालेराव असून व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच व बरेच या व्यक्तीने गावकऱ्यांनी तक्रार करून त्यांच्याशी भेट घेऊन आपल्या अडचणीची त्यांच्याकडे मांडण्यात आल्या .दोन ते तीन दिवस झाले त्यांच्याकडे सारखे जाऊन देगाव लाईटची अडचण मांडण्यात आली. तरी पण आज करू उदा करू उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले . आज पर्यंत देगाव ग्रामपंचायत लगत असलेल्या डि पी केबल जळून खाक झाले. असून कुठल्याच प्रकारची सुविधा मिळालेला नाही अधिकाऱ्यांना फोन लावले असता उचलत नाहीत महावितरण कंपनीचा फार मोठा भोंगळ कारभार चालला आहे . वेळोवेळी तक्रार देऊन किंवा फोन करून पण कोणत्याही प्रकारचे गावकर्यांचे प्रश्न सुटलेले नसून देगाव सलग ते पंधरा दिवस झाले अंधारात आहे. आता गाव पूर्ण अंधारात आहे .महावितरणचे कर्मचारी मात्र वसुली करण्यात मग्न देगाव येथील लाईटचा प्रश्न प्रलंबीतआहे लाईटचा प्रश्न कधी सुटणार का नाही असा प्रश्न ? जनतेस पडला आहे नवीन आलेले शाखा अभियंता यानी तर राजकीय पुढारया सारखे फक्त आश्वासने देत आहेत. कुटलयाच कुठल्याच प्रकारची आत्तापर्यंत पाठपुरावा करण्यात आलेला नसून गावातील व्यक्ती लाईट अभावी पाण्याला त्रस्त व दिवसभर शेतकरी शेतात कष्ट करून रात्री घरी आल्यानंतर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे गावातील लोक मात्र महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर रागाच्या फूलांचा वर्षाव करत आहेत .वेळोवेळी अधिकाऱ्याला किंवा लाईन मिला कल्पना देऊन पण अजून पण लाईटचा प्रश्न सुटले नसल्यामुळे गावातील लोकांनी एकत्रित येऊन थेट महावितरण कार्यालय मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांनी थेट कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. आमच्या मृत्यूला कारणीभूत महावितरण कंपनीचे अभी शाखा अभियंता सर अशी जवाबदार असतील असे सांगण्यात येत आहे.