Home कृषिसंपदा शेतकरी वाचवा, देश वाचवा सायकल यात्रा थेट पालघर मध्ये.

शेतकरी वाचवा, देश वाचवा सायकल यात्रा थेट पालघर मध्ये.

132
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकरी वाचवा, देश वाचवा
सायकल यात्रा थेट पालघर मध्ये.                                           पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ,आत्महत्या रोखण्यासाठी नगर ते संपूर्ण महाराष्ट्र अशी सायकल यात्रा घेऊन निघालेले श्रीयुत बाळासाहेब कोळसे आज पालघर येथे जिल्हाधिकारी पालघर यांच्या भेटीला आले होते.बाळासाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतकरी आत्महत्या या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे आज पर्यंत त्यांनी 32 जिल्ह्यात जाऊन 4800 किलोमिटर चा सायकल प्रवास केला आहे अजूनही काही जिल्ह्यात त्यांचा प्रवास सुरू आहे सर्व जिल्हे झाल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते,कृषी मंत्री यांची भेट घेऊन अहवाल सादर करणार आहेत.
या प्रवासात पालघर येथे येताना मागे पुढे दोन दिवस असा त्यांचा मनोर येथे बिरसायत येथे मुक्काम राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here