राजेंद्र पाटील राऊत
केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ रद्द करून किंमती कमी कराव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.
नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
केंद्र सरकारने सध्या खताच्या किमती मध्ये 50 किलो बॅग ला 150 ते सातशे रुपये एवढी भरमसाठ भाव वाढ केली आहे अतिवृष्टी करुणा महामारी मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत व संकटात सापडला असताना खताची ही भाववाढ शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध करून खताच्या किमती कमी कराव्यात यासंबंधीचे माननीय पंतप्रधान जी माननीय कृषिमंत्री केंद्र सरकार यांना नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष मा हरिहरराव भोसीकर जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. बी. जांभरुणकर युवकाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे उपाध्यक्ष सुभाष गायकवाड. डॉ. परशुराम वरपडे ,रंगनाथ वाघ, श्रीकांत मांजरमकर, यशवंत कांबळे, शरद जोशी, रेखा अहिरे, मीना पेटवडजकर, जीवन पाटील घोगरे, रामदास पाटील, धनंजय सूर्यवंशी, बालासाहेब मदसवाड, शिवानंद हिप्परगेकर, संतोष दगड गावकर, प्रकाश मांजरमकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते