Home उतर महाराष्ट्र साईपालखी यात्रेचे ठेंगोडयात जंगी व उत्साहात स्वागत…!! दानशूर अण्णासाहेब पगारेचा मोलाचा वाटा!

साईपालखी यात्रेचे ठेंगोडयात जंगी व उत्साहात स्वागत…!! दानशूर अण्णासाहेब पगारेचा मोलाचा वाटा!

233
0

राजेंद्र पाटील राऊत

साईपालखी यात्रेचे ठेंगोडयात
जंगी व उत्साहात स्वागत…!!
दानशूर अण्णासाहेब पगारेचा मोलाचा वाटा!
सटाणा,(नयन शिवदे विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- प्रतिवर्षाप्रमाणे सटाणा (यशवंतनगरी) येथून शिर्डीला पायी पदयात्रेला जाणाऱ्या
साईपालखीचे आज ठेंगोडयात आगमन होताच,ठेंगोडा ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांकडून साईपालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी ठेंगोडा गावातून साईपालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.तर सरपंच सौ.चिंधाताई पगारे ,उपसरपंच नारायण निकम यांच्या शुभहस्ते साईबाबांची आरती करण्यात येऊन गावात विविध ठिकाणी साईबाबांच्या पालखीचे पुजन करण्यात येऊन दर्शनाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.
सटाणा येथून दरवर्षी शिर्डी येथे पायी जाणाऱ्या या साईभक्तांच्या पदयात्रेला ठेंगोडा येथील दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब पगारे हे आपल्या परंपरेनुसार अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतात,आजदेखील अण्णासाहेब पगारे यांनी आयोजित केलेल्या अन्नदान महाप्रसादाचा लाभ ठेंगोडावासियांनी घेतला.अण्णासाहेब पगारे हे फक्त ठेंगोडा गाव परिसरातच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एक सामाजिक कार्यातील नावलौकिकप्राप्त व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दुःखात सदैव सक्रीय असणाऱ्या अणौणासाहेब पगारे यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Previous articleडॉ.उत्तमराव सोनकांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
Next articleएमपीएससी परीक्षेचा आणखी एक बळी : पुण्यात अमर मोहिते एमपीएससी विद्यार्थीची आत्महत्या..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here