Home मराठवाडा भाजप सर्व समाजाला न्याय देऊ शकत नसल्यामुळे पदाचा राजीनामा – प्रताप देशमुख...

भाजप सर्व समाजाला न्याय देऊ शकत नसल्यामुळे पदाचा राजीनामा – प्रताप देशमुख जिंतूर मध्ये भाजपला मोठा फटका

195
0

राजेंद्र पाटील राऊत

भाजप सर्व समाजाला न्याय देऊ शकत नसल्यामुळे पदाचा राजीनामा – प्रताप देशमुख

जिंतूर मध्ये भाजपला मोठा फटका

जिंतूर (विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- भारतीय जनता पार्टीच्या जिंतूर मंडळ अध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रताप विनायकराव देशमुख यांनी जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठविला आहे. मागील दोन वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी तालुका जिंतूर प्राथमिक सदस्य व मंडळ अध्यक्ष असून सदस्य झाल्यापासून माझे विचारसरणी व पक्षाची विचारसरणी जुळत नाही
पुढील कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश घ्यायचे हे जिंतूर शहर तालुक्यातील माझे सर्व कार्यकर्त्यांची येत्या दोन-तीन दिवसांत बैठक घेऊन कार्यकर्त्याचे विचार व चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे बोलताना सांगितले
-प्रताप देशमुख

मी एक धर्मनिरपेक्ष
कुटुंबातुन पुढे आलेलो व्यक्ती
आहे. भाजपा पक्ष हा ओ.बी.
सी., मागासवर्गीय आणि
अल्पसंख्याक समाजाला
न्याय देऊ शकत नाही अशी
माझी धारणा झाली आहे व
तसेच अनुभव या दोन वर्षात
मिळाले आहेत.त्यामुळे पक्षात
माझ्या मनाची घुसमट होत
आहे. करिता आज मी भाजपा
पक्षाचा प्राथमिक सदस्य व
जिंतूर तालुका मंडळ अध्यक्ष
पदाचा राजीनामा देत आहे.
माझा राजीनामा जिल्हाध्यक्ष
यांनी स्वीकार करावा या
राजीनाम्यामुळे राजकीय
वर्तुळात खळबळ माजली
असून जिंतूर शहरात होणाऱ्या
नगरपालिका
निवडणुकीत मुस्लिम मतदान
लक्षात ठेवत भाजप ला
सोड चिठ्ठी दिली अशी चर्चा
असून भविष्यामध्ये प्रताप
देशमुख कोणत्या पक्षात
जाणार हे अद्यापि स्पष्ट
झाले नसल्याने या विषयी
उलट सुलट चर्चा होत आहे.

Previous articleउमरदरीवाडी येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहन व सप्ताहाताची सांगता
Next articleपाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी जिंतूरच्या मुस्लीम बांधवाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here