Home माझं गाव माझं गा-हाणं पालघर खासदारां कडून श्रीधर रमेश चामरे ह्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत.

पालघर खासदारां कडून श्रीधर रमेश चामरे ह्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत.

85
0

राजेंद्र पाटील राऊत

पालघर खासदारां कडून श्रीधर रमेश चामरे ह्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत                                                                    पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज)

पालघर दिनांक ८/ ११/ २०२१ गुजरात राज्यातील जलपरी या बोटीवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे (३२) हा तरुणाचा जागीच मृत्यू झाला.या बोटीचे कॅप्टन (तांडेल) हे देखील या गोळीबारात जखमी झाले आहेत. श्रीधर रमेश चामरे ह्याच्या कुटुंबाला पालघर खासदार राजेंद्र गावित ह्यानी मंगळवार दिनांक ८/११/२०२१ भेट दिली व रुपये ५००००/- धनादेश कुटुंबाला दिला
व शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले .
तसेच हा विषय लोकसभेत उपस्थित करण्याचे आश्वासन ,मच्छीमार सोसायटीचे पदादिकारी व गावकरी उपस्थित होते संपूर्ण गाव शोकाकुल आहे

गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई यांच्या जलपरी बोटीत श्रीधर चामरे हा तरुण मागील तीन महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता.ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करीत असताना पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सैनिकांनी गोळीबार केला.या गोळीबारात वडराई येथील मच्छिमार श्रीधर चामरे यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पाकिस्तान सैनिकांच्या अमानवी कृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे.

Previous articleआदिवासी एकता मित्र मंडळ मनोर ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च व ठिय्या आंदोलन
Next articleवाखरी येथे नगीन शिवारात वन विभागात भीषण आग ग्रामस्थांच्या मदतीने आटोक्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here