राजेंद्र पाटील राऊत
🛑 मुंबई लोकलमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी…! हा महत्वाचा निर्णय 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕ कोरोचा उद्रेक कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. आता मुंबई लोकलमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही ‘यूनिव्हर्सल पास’ सक्तीचा करण्यात आला आहे. तसेच दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. लोकलमधील गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. राज्य सरकारने परिपत्रक जारी करून हा नवा नियम लागू केला आहे.
यापूर्वी केवळ एक डोसवर किंवा लसीच्या कोणत्याही बंधनाशिवाय या कर्मचाऱ्यांना रेल्वे पास दिला जात होता. मात्र आता लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांनाच युनिव्हर्सल पास दिला जाणार आहे. तर दुसरीकडे रुग्णवाढ ओसरताच मुंबईकरांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे.
दुसऱ्या डोसची तारीख टळूनही 3 लाख मुंबईकरांनी दुसरा डोस घेतलाच नाही. ९७ टक्के मुंबईकरांनी पहिला डोस घेतलाय. ५५ टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाले आहे.
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक साडे एकोणतीस लाख नागरिकांचं लसीकरण झाले आहे.⭕