Home विदर्भ अतिवृष्टीमुळे पीक पाण्यात गेले; चिंताग्रस्‍त तरुण शेतकऱ्याने लावला गळफास

अतिवृष्टीमुळे पीक पाण्यात गेले; चिंताग्रस्‍त तरुण शेतकऱ्याने लावला गळफास

309
0

राजेंद्र पाटील राऊत

अतिवृष्टीमुळे पीक पाण्यात गेले; चिंताग्रस्‍त तरुण शेतकऱ्याने लावला गळफास
ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज

ः तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, ३० सप्टेंबर रोजी दुपारी बाराला बेराळा (ता. चिखली) समोर आली आहे.

अमोल प्रकाश सूरडकर (२५, रा. बेराळा, ता. चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. अमोलकडे बेराळा शिवारात ४ एकर शेती आहे. त्याच्यावर इंडियन ओव्हरसीज बँकेचे ८० हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र यंदा अतिवृष्टी झाल्याने पीक पाण्यात गेले. त्यामुळे तो चिंतेत होता, असे कौटूंबिक सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Previous articleपालघरचे शिवसेनेचे खासदार आपली दुकानदारी चालवत आहेत—नाना पटोले
Next articleसोनार पाडा गावातील लोकांनी उमटवला माणुसकीचा ठसा….!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here