Home मुंबई मंत्रालयातील सचिवांना विभागातील पद भरतीच गांभीर्यच राहील नाही का? उपमुख्यमंत्रांच्या आदेशाचे उल्लंघन!

मंत्रालयातील सचिवांना विभागातील पद भरतीच गांभीर्यच राहील नाही का? उपमुख्यमंत्रांच्या आदेशाचे उल्लंघन!

305
0

राजेंद्र पाटील राऊत

मंत्रालयातील सचिवांना विभागातील पद भरतीच गांभीर्यच राहील नाही का? उपमुख्यमंत्रांच्या आदेशाचे उल्लंघन!

ठाणे: (प्रतिनिधी,युवा मराठा न्यूज चॅनल)
एमपीएससी च्या परीक्षा आधीच उशिरा होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३० सप्टेंबर पर्यंत रिक्त पदांची माहिती शासन विभागाला दिली होती. परंतु ४३ विभागांपैकी १० विभागानी माहिती दिली आहे.

वेगवेगळ्या शासकीय भरती प्रक्रियेसाठी असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाने कडक पवित्रा धारण केला आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात संघटनांकडून तसेच असंघटित व्यक्ती यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने सांगितले आहे.
भरती प्रक्रियेसंदर्भात संघटनांकडून तसेच असंघटित व्यक्ती यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने सांगितले आहे. आयोगाने याबाबत एक सविस्तर पत्रक जारी केले आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागात नोकरभरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. राज्य लोकसेवा आयोगाकडून या भरती प्रक्रियेचे संचलन तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यात येते. राज्य लोकसेवा आयोग हा स्वायत्त आहे. त्यावर राज्य सरकार तसेच कोणतीही संघटना किंवा व्यक्ती यांचे नियंत्रण नसते. मात्र, मागील काही वर्षांपासून या आयोगावर विविध संघटना तसेच असंघटित व्यक्ती यांच्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे निदर्शनास आल्याचे आयोगाे म्हटलेय. याच गोष्टीची दखल घेत राज्य लोकसेवा आयोगाने आता कडक पवित्रा धरण केला आहे. यापुढे आोयगावर कोणत्याही संघटनेने वा असंघटित व्यक्तीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला वा तसे निदर्शनास आले तर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.
राज्य लोकसेवा आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. असे असले तरी आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या भरतीप्रक्रियेसंदर्भात उमेदवारांकडून ज्या तक्रारी तसेच आवेदने येतात, त्याचा नेहमी गुणवत्तेवर विचार केला जातो, असंदेखील आयोगाने आपल्या पत्रकार म्हटलं आहे. राजकीय संघटनांमार्फत आयोगावर येणारा दबाव पाहता एमपीएससीने त्यांची कार्यपद्धती स्पष्ट केलीय.

MPSC कडे रिक्त पदांची माहिती देण्यास विलंब

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जमा करण्यास सांगितली होती. मात्र, काही विभागांनी एमपीएससीला माहिती देण्यास दिरंगाई केल्याचं समोर आलं आहे. सरकार रिक्त पदांची माहिती जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देणार का हे पाहावं लागणार आहे.

Previous articleठाण्यात महापालिका सहायक आयुक्तांना निष्काळजीपणा नडला! महापौरांनी दिले चौकशीचे आदेश ?
Next articleजवाहर नवोदय विद्यालय नाशिक (खेडगाव) येथे ब्रिजेश प्रदीप शिरसाठ यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here