Home गुन्हेगारी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने पानेदोन लाखाच्या ऐवजांसह घेतले दोन चोरट्यांना ताब्यात

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने पानेदोन लाखाच्या ऐवजांसह घेतले दोन चोरट्यांना ताब्यात

120
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने पानेदोन लाखाच्या ऐवजांसह घेतले दोन चोरट्यांना ताब्यात

 

नांदेड / राजेश भांगे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

 

 

 

स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात दोन गुन्हेगारांना पकडून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी केलेल्या पाच चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत तर सोबतच १ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा चोरी गेलेला ऐवज जप्त केला आहे .

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सक्षम नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार सखाराम नवघरे, पद्मसिंह कांबळे , बालाजी तेलंग , गणेश धुमाळ , विलास कदम , विठ्ठल शेळके आणि शंकर केंद्रे यांनी लोकमित्रनगर नांदेड भागात दोन आरोपींना पकडले. त्यांची नावे शैलेश उर्फ खन्या नवनाथ सावतं रा.तळणी ता.जि.नांदेड आणि आकाश बळीराम आळणे रा.लोकमित्रनगर नांदेड यांना ताब्यात घेतले.
तर यावेळी यांच्यासोबत आणखी एक तिसरा चोरटा राजू कांबळे रा.नवजीवननगर नांदेड हा पण होता असे सांगितले. पकडलेल्या चोरट्यांकडून भाग्यनगर पोलीस ठाण्यात सन २०२१मध्ये दाखल झालेले गुन्हे क्रमांक ७५,९४,१३०,१६३ आणि ३०४ असे पाच गुन्हे उघडकीस आणले. या चोरट्यांकडून १६३ गुन्ह्याचा ऐवज वगळता इतर गुन्ह्यातील सोन्याचे रिंग, सोन्याच्या बांगड्या, मनीमंगळसुत्र, कानातील सोन्याचे वेल, सोन्याचे मनी, रोख रक्कम चांदीच्या दोन समई आणि १० ऍनरॉईड मोबाईल असा एकूण १ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे . गुन्हा क्रमांक १६३ चा ऐवज राजू कांबळे या चोरट्याकडे आहे असे पकडलेले चोरटे सावंत आणि आळणे सांगतात . स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेले दोन चोरटे आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केला आहे.
तर या कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे.

Previous articleमहाराष्ट्र शासनात तब्बल २ लाख १९३ जागा रिक्त : तरी बेरोजगारी वाढते का? मुंबई : (अंकुश पवार,ठाणे शहर- प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज नेटवर्क) आज दि.१६.०९.२०२१ मुंबई (मंत्रालय) येथे सामान्य प्रशासन विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत वाढती बेरोजगारी व महाराष्ट्र शासनात रिक्त पदांच्या भरतीसाठी चर्चा झाली. चर्चेदरम्यान शासनात तब्बल २ लाख १९३ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न पडतो. या बैठकीत रिक्त पदे प्रमुख कोणत्या कारणाने आहेत याचा आढावा घेण्यात आला:१. (Maharashtra Government) शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा व पदोन्नतीच्या मिळून तब्बल दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिक्त जागांमध्ये जिल्हा परिषदांमधील तब्बल ४६ हजार ९६२ जागा आहेत. २. आउटसोर्सिंग, कंत्राटीवर जोर राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. नोकरी मिळत नाही म्हणून अनेकांची स्थिती बिकट झाली असून तरुण वाममार्गाला लागला आहे. असे असतानाही नव्या नोकरभरती ऐवजी शासनाचा आउटसोर्सिंग, कंत्राटी पद्धतीवर अधिक जोर दिसतो. कारण निवृत्तांना पुन्हा कंत्राटी तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जात असल्याचे दिसत आहे. ३. एमपीएससी’ची निवांत ढकल गाडी राज्य लोकसेवा आयोगाची सरळसेवा भरतीबाबतही संथगती पहायला मिळते. कॉललेटर, प्रशिक्षण, परिवीक्षाधीन कालावधी याला बराच वेळ लागतो आहे. आयोगाने २०१८ला फौजदार पदासाठी काढलेली जाहिरात. या पदासाठी २०१९ ला निवड झाली मात्र त्यानंतर दीड दोन वर्ष उलटल्यानंतर २०२१ मध्ये त्या उमेदवारांना प्रशिक्षणाला पाठविण्यात आले आहे. ४. वर्गवारीनुसार रिक्त पदे अ वर्ग-१० हजार ५४४ ब वर्ग-२० हजार ९९९ क वर्ग-१ लाख २७ हजार ७०५ डवर्ग-४० हजार ९४४ एकूण-२ लाख १९३ त�
Next articleग्रामीण रूग्णालय, वरवट बकाल रूग्णालय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here