राजेंद्र पाटील राऊत
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या – सचिन पा.इंगोले
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
गेल्या दहा दिवसापासुन नांदेड जिल्हयात सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे . आज शेतकरी राजा कोलमोडुन पडलेला आहे . श्तकरी राजाला उभा करणे व त्यांना आर्थिक मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे . मुख्यमंत्री साहेब , एखादया कर्मचाऱ्याचा एक महिन्याचा पगार न झाल्यास तो कर्मचारी किती अडचणीत असतो ? त्या कर्मचाऱ्याला एक महिना संसार कसा चालवावा याच टेंशन येत असत मग तर इथे बळीराजाचे वर्षाचे पिक होत्याचे नव्हते झाले . शेतकरी राजा एका दान्यापासुन हजारो दाने करण्याच्या उद्देशाने शेतामध्य राबत असतो पण निर्सगाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला आपल्या दारात यावे लागत आहे . वरील सर्व गोष्टीचा विचार करुन मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपये तेही वीस दिवसाच्या आत्ता देण्यात यावे.
अदि मागण्याचे निवेदन तहसिलदार मार्फत राज्यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांना पाठवण्यात आले.मागण्या मान्य न झाल्यास राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतिने यापेक्षा ही आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिले.
यावेळी राजमुद्रा सामािक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पा. इंगोले , जिल्हाध्यक्ष शहाजी पा. शिंदे , सचिन चव्हाण , बंटी गायकवाड , श्रीकांत बस्वदे , साईनाथ गोडबोले ,सलमान पठाण,आरिफ शेख , अमोल अतनुरे , बालाजी इंगोले , कपिल काटेवाड, बाळू पिटलेवाड , यौगेश जाधव,कपिल मोटरगेकर यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.