राजेंद्र पाटील राऊत
जाहूर परिसरात खरीप हंगामातील पिकावर गोगल गाईंचा मोठ्या प्रमाणात हल्ला. मोड आलेली अंकुर खाऊन करत आहेत फस्त..
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील जाहुर परिसरात खरीप हंगामातील उगवण होत असलेल्या कापूस, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे अंकुर गोगलगाई खाऊन मोठ्या प्रमाणात फस्त करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक कीटकनाशके फवारणी केली तरी गोगलगाई काही कमी होण्याची प्रमाण दिसून येत नाही. यामुळे शेतकरी राजा पुरता हवालदिल झालेला आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून नशिबाला चिकटलेल्या गोगलगायीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी राजा खरिपाच्या पेरणीला अगोदरच परेशान असल्याने त्यातच हे नवं संकट त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
▪️ गत तीन ते चार वर्षापासून परिसरात मोठ्या प्रमाणात गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस उडीद मूग इत्यादी पिकांना खाऊन पुर्णतः उध्वस्त करीत आहेत. औषध फवारणीचा गोगलगायी वर काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे इतर मशागतीचे कामे बाजूला सारून गोगलगाय वेचून शेताच्या कडेला बांधावर फेकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
हनमंत शिरगिरे शेतकरी उंद्री(प.दे.)