Home माझं गाव माझं गा-हाणं तौक्ते वादळाने आंबा फळबागेचे, घरांचे मोठे नुकसान खा.डॉ.भारती पवार यांनी केली नुकसानीची...

तौक्ते वादळाने आंबा फळबागेचे, घरांचे मोठे नुकसान खा.डॉ.भारती पवार यांनी केली नुकसानीची पाहणी सरसकट पंचनामे करण्याच्या केल्या सूचना             

289
0

राजेंद्र पाटील राऊत

तौक्ते वादळाने आंबा फळबागेचे, घरांचे मोठे नुकसान खा.डॉ.भारती पवार यांनी केली नुकसानीची पाहणी सरसकट पंचनामे करण्याच्या केल्या सूचना                                                              सटाणा,(जगदिश बधान बागलाण विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका हा महाराष्ट्राच्या काही भागांना बसला असून त्यात गुजरातच्या सीमेलगत असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील कळवण, सुरगाणा ,पेठ, दिंडोरी तालुक्यातील गावांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे . ह्यात अनेक आदिवासी शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. ह्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता खा.डॉ.भारती पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक, खुंटविहीर, सतखांब उंबरठाण, भोरमाळ या गावांना भेट देत तेथील नुकसानीचा आढावा घेतला. या परिसरातील इतर गावांना देखील आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंब्याच्या व इतर फळांच्या संपूर्ण फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. सुरगाणा तालुक्यातील सुमारे पंधराशे हेक्टर आंबा फळबागेची लागवड असून सुमारे बाराशे हेक्टरच्या पुढे आंबा फळबागेची नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे अनेक शाळांचे ,शासकीय इमारतींचेही नुकसान झाले असून तालुक्यातील काही घरांचेही अंशतः नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अधिकाऱ्यांनी तात्काळ या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. केंद्रसरकार पण ह्या वादळात नुकसानझालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचेही खा. डॉ. भारती पवार यांनी सांगितले. ह्या प्रसंगी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस एन.डी. गावित, भाजपा उपजिल्हाध्यक्ष रमेश थोरात, भाजपा युवामोर्चाचे सचिन महाले, तहसीलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी के.एम.गायकवाड, कृषीअधिकारी झिरवाळ, कृषीसहाय्यक भोये, तलाठी चौधरी, ग्रामसेवक प्रदीप पवार, सरपंच देविदास देशमुख, पोलीसपाटील सीताराम देशमुख, लक्ष्मण गायकवाड,सखाराम गावित, योगेश चव्हाण, प्रेमराज पवार, विठ्ठल गावित, उखरम पेठे, पोपट पवार, गावकरी उपस्थित होते.तौक्ते वादळाने आंबा फळबागेचे, घरांचे मोठे नुकसान खा.डॉ.भारती पवार यांनी केली नुकसानीची पाहणी सरसकट पंचनामे करण्याच्या केल्या सूचना

नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका हा महाराष्ट्राच्या काही भागांना बसला असून त्यात गुजरातच्या सीमेलगत असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील कळवण, सुरगाणा ,पेठ, दिंडोरी तालुक्यातील गावांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे . ह्यात अनेक आदिवासी शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. ह्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता खा.डॉ.भारती पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक, खुंटविहीर, सतखांब उंबरठाण, भोरमाळ या गावांना भेट देत तेथील नुकसानीचा आढावा घेतला. या परिसरातील इतर गावांना देखील आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंब्याच्या व इतर फळांच्या संपूर्ण फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. सुरगाणा तालुक्यातील सुमारे पंधराशे हेक्टर आंबा फळबागेची लागवड असून सुमारे बाराशे हेक्टरच्या पुढे आंबा फळबागेची नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे अनेक शाळांचे ,शासकीय इमारतींचेही नुकसान झाले असून तालुक्यातील काही घरांचेही अंशतः नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अधिकाऱ्यांनी तात्काळ या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. केंद्रसरकार पण ह्या वादळात नुकसानझालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचेही खा. डॉ. भारती पवार यांनी सांगितले. ह्या प्रसंगी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस एन.डी. गावित, भाजपा उपजिल्हाध्यक्ष रमेश थोरात, भाजपा युवामोर्चाचे सचिन महाले, तहसीलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी के.एम.गायकवाड, कृषीअधिकारी झिरवाळ, कृषीसहाय्यक भोये, तलाठी चौधरी, ग्रामसेवक प्रदीप पवार, सरपंच देविदास देशमुख, पोलीसपाटील सीताराम देशमुख, लक्ष्मण गायकवाड,सखाराम गावित, योगेश चव्हाण, प्रेमराज पवार, विठ्ठल गावित, उखरम पेठे, पोपट पवार, गावकरी उपस्थित होते.

Previous articleपिंगळवाडेत कोरोना लसीकरण सत्र संपन्न
Next articleहरपुडे:चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना गाव विकास समितीचे महेंद्र घुग सर व अनघा कांगणे यांच्याकडून तातडीची अल्पशी आर्थिक मदत 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here