राजेंद्र पाटील राऊत
खतांची दर वाढ व तुर आयाती च्या विरोधात शेतकऱ्यांनी ताळी व थाळी वाजवून निषेध करावा – राज्यमंत्री ना. बच्चु कडु
राजेश एन भांगे
केंद्र सरकारच्या खत भाव वाढीच्या निषेधार्थ व तुर, मुड, उडिद याच कारण नसताना सरकारने देशामध्ये आयात करून आयातीचे निर्बंध घातले.
ते घुले करणे व तसेच देशातील माल बाहेर जाऊ द्यायचे नाही उलट आयात करून
शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडत आहे.
आणि देशात दोन लाख टन तुर जास्त असतांना देखिल पुन्हा आठ लाख टन तुर मोदिजी आयात करत आहेत.
कोणासाठी कशासाठी हे उत्तर मोदिंन कडुन मिळाले नाही.
तर एकिकडे देशातील माल बाहेर जाऊ द्यायचे नाही उलट आयात करायचे, हे कोणाच्या प्रेशर खाली किती करप्शन आपण याच्या मध्ये करणार आहात हे केंद्र सरकारने सांगितले पाहिजे.
तुरीची आयात थांबली पाहिजे व खतांचे वाढलेले भाव याच्या निषेधार्थ
राज्यमंत्री ना.बच्चू कडू आता आक्रमक झाले असून.
ना.बच्चु कडु यांनी उद्याच्या २० तारखेला सगळयाच शेतकऱ्यांनी घरी किंवा चौकात जिथं असेल तीथ जे आम्हाला मोदिजींनी मुलमंत्र दिले होते कोरोणा वाढु नये म्हणून.
तेच शस्त्र वापरून तुर आयात थांबवावे व खतांच्या भाव वाढिच्या निषेधार्थ ताळी आणि – थाळी वाजवुन दिनांक वीस तारखे ला आपण या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती राज्यमंत्री बच्चु कडु यांनी केली आहे.