Home महाराष्ट्र म्युकरमायकोसिसवरील औषधोपचारासाठी राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार...

म्युकरमायकोसिसवरील औषधोपचारासाठी राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची घोषणा

165
0

राजेंद्र पाटील राऊत

म्युकरमायकोसिसवरील औषधोपचारासाठी राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची घोषणा

राजेश एन भांगे

 

म्युकरमायकोसिस आजाराचा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ३० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात राज्यातील कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला.

यावेळी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे (व्हीसीद्वारे), मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाय योजनांसाठी तातडीने पावले उचलावीत असे निर्देश त्यांनी दिले.
या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी.
यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी.
तिसरी लाट येण्यापूर्वी ही व्यवस्था यथाशिघ्र उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

Previous articleसहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड यांचा सन्मान
Next article“अजित पवारांनी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवला” – भाजप आमदार कृष्णा खोपडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here