राजेंद्र पाटील राऊत
कासारवाडी येथे विज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू
कोल्हापूर प्रतिनिधी : आज अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून टोप ता.हातकणंगले येथील भरत संभाजी वाणी (वय ४२, )रा. टोप ता.हातकणंगले (मुळगाव बीड येथील) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. भरत हा कासारवाडी येथील शेतात ऊसाला पाणी पाजत असताना अचानक वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस आल्याने शेजारीच लिंबाच्या झाडाखाली आसरा घेण्यासाठी गेले असता लिंबाच्या झाडावर वीज पडून ही दुर्घटना घडली. यावेळी त्यांची दोन मुले सुदैवाने बचावली व किरकोळ जखमी झाली .
आज सायंकाळच्या सुमारास भरत वाणी हे आपली दोन मुले करण आणि अर्जुन या दोघांना सोबत घेऊन शेतामध्ये गेले होते. कासारवाडी येथे अवकाळी पाऊस सुरू झाल्यावर तिघेही शेतातील लिंबाचे झाडाच्या आडोशाला उभे राहिले. यावेळी विज पडून भरत वाणी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन्ही मुलांनी तेथून पळ काढल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.त्याची पत्नी कासारवाडी येथे दुध घालणेकरीता गेली होती .
सदर घटणेची माहीती होताच तिने घटणास्थळी धाव घेतली .
त्यांच्या कूठुंबाचा आक्रोश हृदय हेलावणारा होता .
घटणास्थळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे आनिल पाटील करत आहेत.