Home नांदेड लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन , पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या पाठपुराव्याला...

लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन , पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.

146
0

राजेंद्र पाटील राऊत

लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन , पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्याचे माननीय नामदार श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मागणीनुसार लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसन या मागणीला आज तत्वतः मान्यता देण्यात आली. दहा वर्षापासून रखडलेल्या मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण आंतरराज्यीय प्रकल्पाला या निर्णयामुळे पुन्हा चालना मिळणार आहे. लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या प्रमुख मागणीला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मागील दहा वर्षांपासून रखडलेला मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण आंतरराज्यीय लेंडी प्रकल्पाला पुन्हा चालना मिळणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी मागील दहा वर्षापासून या प्रकल्पाचे काम थांबले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब सातत्याने प्रयत्नशील असून त्यांनी काही काळापूर्वीच प्रकल्पग्रस्तांच्या समितीची बैठक घेतली होती. पुनर्वसनासंदर्भात समितीने केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने आज मुंबईत आयोजित बैठकीत चर्चा झाली. यावेळी लेंडी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. श्री अशोकरावजी चव्हाण यांनी समितीच्या मागण्या विस्तृतपणे मांडल्या. या आंतरराज्यीय प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त समितीच्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरला. बैठकी अंती मदत व पुनर्वसन मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी समितीच्या महत्वपूर्ण स्वेच्छा पुनर्वसनाच्या मागणीला तत्वतः मान्यता दिली. या निर्णयानुसार स्वच्छ पुनर्वसनाचा मध्ये शेतकरी कुटुंब, बिगर शेतकरी कुटुंबासह वाढीव कुटुंबाचाही समावेश केला जाईल. या स्वेच्छा पुनर्वसनासाठी अंदाजित खर्च सुमारे 169.77 कोटी रुपये आहे. ज्या दिवशी या बाबत शासनाचा आदेश जारी होईल, त्या तारखेपर्यंतच्या वाढीव कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी पात्र धरण्याची मागणी पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी केली. व विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी सुद्धा मान्य केली आहे.

Previous articleमराठा आरक्षणाचा कायदा’, कराचा मुख्यमंत्री ठाकरेची पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती
Next articleमन्याड नदीवरील नारनाळी येथील पूलांचे आज आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here