Home नांदेड खावटी योजनेसाठी जिल्ह्यातील १०,२८४ आदिवासी कुटुंबांचे अर्ज मंजूर. ▪️ पालक मंत्री श्री...

खावटी योजनेसाठी जिल्ह्यातील १०,२८४ आदिवासी कुटुंबांचे अर्ज मंजूर. ▪️ पालक मंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी दिली माहिती.

102
0

राजेंद्र पाटील राऊत

खावटी योजनेसाठी जिल्ह्यातील १०,२८४ आदिवासी कुटुंबांचे अर्ज मंजूर.
▪️ पालक मंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी दिली माहिती.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
महाविकास आघाडी सरकारने आदिवासी कुटुंबांसाठीची खावटी योजना पुनरूज्जीवित केल्याने नांदेड जिल्ह्यातील हजारो कुटुंबियांना लाभ होणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १० हजार २८४ अर्ज मंजूर झाले आहेत.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला होता. मी सुद्धा हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी खावटी योजना पुनरूज्जीवित करण्याचा निर्णय घेतला व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गेल्या १ मे रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.

या खावटी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे ११ लाख ५५ हजार आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी ४ हजार रूपयांचा लाभ दिला जाईल. यामध्ये २ हजार रूपये किंमतीचे अन्नधान्य व इतर वस्तू तसेच २ हजार रूपये रोख बँक खात्यामार्फत दिले जाणार आहेत. या योजनेसाठी राज्य स्तरावर सुमारे ४८२ कोटी रूपये खर्च केले जातील. प्रामुख्याने दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींसाठी राज्य सरकारचा हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये या योजनेचा सर्वाधिक लाभ आदिवासीबहूल किनवट तालुक्याला मिळणार असून, आजपावेतो येथील ५ हजार १२७ अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल माहूर १ हजार ७७२, हदगाव १ हजार ७६५, हिमायतनगर ८०७ तर भोकर तालुक्यातील ६९२ अर्जदार या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत.

यापूर्वी खावटी कर्जरूपात दिली जायची व ते कर्ज नंतर परत करावे लागायचे. परंतु, या योजनेमध्ये मिळणारी रक्कम हे अनुदान आहे व त्यामुळे लाभार्थ्यांनी ते परत करण्याची गरज असणार नाही.

Previous articleमहाराष्ट्र राज्य विकास आघाडी प्रणीत विद्यार्थी विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रविण श्रिरामे यांची निवड…
Next articleझेप प्रतिष्ठान तर्फे ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here