Home नांदेड नायगाव येथे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांच्या हस्ते कोव्हिड सेंटरचे शुभारंभ

नायगाव येथे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांच्या हस्ते कोव्हिड सेंटरचे शुभारंभ

214
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव येथे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांच्या हस्ते कोव्हिड सेंटरचे शुभारंभ

राजेश एन भांगे

देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून हे संक्रमण रोखण्यासाठी राज्यस्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत.
तर रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने रुग्णांचे हाल होत असुन उपचाराकरीता बेड मिळणे सुद्धा कठीण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात व नायगांव तालुक्यातील नागरिकांच्या उद्भवलेल्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण यांनी कोव्हिड रुग्णांसाठी साई माऊली सार्वजनिक कोवीड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्याच अनुषंगाने आज रोजी नायगाव तालुक्यातील कोवीड रुग्णांनसाठी सुरू होत असलेल्या साई माऊली सार्वजनिक कोवीड सेंटरचे शुभारंभ जिल्हाधिकारी मा.विपीन इटनकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

तरी या कोविड सेंटर च्या शुभारंभ प्रसंगी विधान परिषद प्रतोद आमदार अमरनाथ राजुरकर, माजी आमदार व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, मनपा आयुक्त सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, जिल्हापरिषद शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे, तहसीलदार गजानन शिंदे, नायगाव चे पोलिस निरीक्षक श्रीआर पडवळ, पंचायत समिती उपसभापती संजय शेळगावकर, मा.श्रीनिवास.पा. चव्हाण, एज्युकेशन सोसायटी चे सचिव रविंद्र वसंतराव पा.चव्हाण, नगरपंचायतचे उपाध्यक्ष विजय पा.चव्हाण, धनराज शिरोळे तसेच नगरपंचायतचे सर्व नगरसेवक आणि डॉक्टरसेलचे पदाधिकारी पत्रकार बांधव व तसेच गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.

Previous articleशिक्षकांचे कार्य कौतुकास्पद: राजेंद्र अहिरे
Next articleविजयसिंह यादव महाविद्यायाचे प्रा. नवनाथ चव्हाण यांचे सेट परीक्षेत यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here