Home विदर्भ कोरोना वाढतोय; नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करावे : पालकमंत्री

कोरोना वाढतोय; नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करावे : पालकमंत्री

113
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना वाढतोय; नागरिकांनी प्रतिबंधात्मक

उपाय योजनांचे पालन करावे : पालकमंत्री

कोविड प्रोटोकॉल ‘, गंभीरतेने राबविण्याचे प्रशासनाला निर्देश                                              (देवेंन्द्र थोटे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

नागपूर, दि.१३ : गेल्या काही दिवसात नागपूरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोणत्याही परिस्थितीत मागच्या वर्षीची परिस्थिती निर्माण होता कामा नये. त्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.

डॉ.नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक बोलावून रुग्ण संख्या का वाढत आहे? या संदर्भातील माहिती घेतली. नागरिकांना देखील त्यांनी या बैठकीतून आवाहन केले आहे की, कोरोना आजार अद्याप हद्दपार झालेला नसून नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायरचा वापर करणे व सुरक्षित अंतर राखून दैनंदिन व्यवहार करणे, आवश्यक असल्याचे सांगितले आहे.आजच्या वरिष्ठस्तरीय बैठकीमध्ये विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आर.पी.सिंग, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डि.एस.सेलोकर, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वप्रथम ग्रामीण भागातील परिस्थिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या चाचण्यांची व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी महानगरपालिका संदर्भात आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांच्याकडून माहिती जाणून घेतली. गेल्या 12 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली असून ती का झाली यासंदर्भात महानगरपालिका प्रशासन अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व टास्क फोर्सच्या अन्य सदस्यांना देखील रुग्णसंख्या वाढीसंदर्भात या वेळी विचारणा करण्यात आली. वातावरणातील बदलामुळे आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचेही पुढे आले. मात्र त्यासोबतच नागरिकांनी गेल्या काही दिवसात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांकडे दुर्लक्ष केले असल्याचे निरीक्षण अनेकांनी मांडले. वैद्यकीय क्षेत्राने याबाबत चिंता व्यक्त केली.

या बैठकीत डॉ. नितीन राऊत यांनी पुढील उपाययोजना सुचविल्यात. यामध्ये ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड चाचणीची संख्या वाढविण्यात यावी, धार्मिक स्थळे व अन्य माध्यमातून नागरिकांना मास्क वापरणे व कोरोना संदर्भातील अन्य नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्याचे सांगितले. स्वयंसेवी संस्थांनी गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये सहभागी व्हावे, मास्क न वापरणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मास्क वाटप करण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागात, गावात, शहरात, वार्डात जनजागृती करावी. उत्तम काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जिल्हा परिषद व महानगरपालिकेमार्फत सत्कार व्हावा, कॉल सेंटर पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावे, प्रसिद्धी मोहिमेला गती देण्यात यावी, असे निर्देश दिले. लग्नसमारंभातील वाढत्या उपस्थितीवर निर्बंध घालण्यात यावे, बाजार शाळा-महाविद्यालयांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे कडक पालन, शहरांमध्ये मास्क न वापरण्याच्या संदर्भात कारवाई करण्यात यावी, ग्रामीण भागात पोलिसांनी कारवाई सुरू करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. पुन्हा आठ दिवसांनी या संदर्भातला आढावा घेतला जाणार असून कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढता कामा नये, असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.

Previous articleतळवाडे सरपंचपदी अहिल्याबाई जाधव तर उपसरपंचपदी प्रमोद (पप्पू) कदम बिनविरोध
Next articleसावंत संजय देशमुख यांचे दुःखद निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here