राजेंद्र पाटील राऊत
वनविभाग सुस्त बिबटया मस्त, वटार परीसरात बिबट्या शेळ्यांवर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात
सटाणा नारायण भोये युवा मराठा न्युज नेटवर्क)
वटार येथिल सावतावाडी वस्तित बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकरयांच्या दुभती जनावरांवर ताव मारत आहे आज मध्य रात्री वटार शिवारातील गट नंबर २७ मधील दशरथ येसा महारणर यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला चढवत एक शेळी व कुत्रा ठार केल्याने गरीब मेंढपाळ आर्थिक अडचणीत सापडला असून जवळपास 6 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दररोजच् सायंकाळ पासुनच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतो. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी ह्या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरेहि मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुन्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व मेंढपाळ धास्तावला आहे.
” गेल्या सहा महिन्यात सहा ते सात वेळा हल्ले करून 20ते 25 निष्पपाप मुक्या प्राण्यांचा जीव गेला आहे, अनेक दिवसापूर्वी सावतावाड़ शिवरात बिबट्याचा वावर आहे. वनपाल उडवा उडवीचे उत्तर देऊन वनपाल आपल्या अंगावरचे काम झटकत असतात, अस वाटतंय वनविभाग सुस्त बिबटया मस्त अस नागरिकांना वाटतंय, वनपालांच्या कृपेने परिसरात अवैद्य वृक्ष तोड होते तेव्हा वनपाल लक्ष्य घालतात, मग बिबटयाचा हल्ला होतो तेव्हा कुठे जातात हा सवाल उपस्थित होत आहे. सावतावाड़ि परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून दोन तीन शेतकऱ्याना मुक्त दर्शनही दिले आहे. दरववर्षि पाण्याचा शोधात येथे बिबट्या येतो व् पाळीव प्राण्याणवर ताव मारतो. येथे लपन्यासाठी मोठी काटेरी जुड़पे आहेत. त्याचा फायदा घेत बिबट्या आपले काम फत्य करुण घेतो”.
मेंढपाळ तर दर वर्षी जेरिस आले असून दरवर्षी 10 ते 12 मेँढ़या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोड़धंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागुण काडावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत.
गेल्या तीन ते चार महिन्यात 25 पाळीव प्राण्याना आपला जिव गमवावा लागला असून, भक्ष्याच्या शोधत बिबटया एका वृद्ध महिलेवर्ती हल्ला केला होता प्रसंगावधाने महिलेचे प्राण वाचले, वस्तीनवर मुक्त दर्शन देतो तरिपन प्रशासन काय करत आहे. असच चालत राहील तर बिबट्या लवकरच मानवी हानी होऊ शकते अस परिसरातील नागरिकांच् मत आहे.