राजेंद्र पाटील राऊत
अवकाळी पावसामुळे आर्थिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईच्या मागणीसाठी निवेदन सादर..!! (जगदिश प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) सटाणा● गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने बळाराजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.काळ्या मातीतील पिकांची पुर्णपणे वाट लागली असुन, बागलाण तालुक्यांतील पिकांचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे .त्यामुळे या नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ भरपाई मिळावी या आशयाचे निवेदन तहसीलदार शुभम गुप्ता यांना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष व शेतकरी मित्र बिंदु शेठ शर्मा यांच्या वतीने देण्यात आले.
सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने कांदा, द्राक्ष, हरभरा, भाजीपाला, गहू, आंबा इत्यादी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यांतील लागवड क्षेत्राखालील जवळपास निम्म्या द्राक्षांची `वाट’ लागली आहे. कोरोना व लॉकडाऊन या कारणांमुळे आधीच शेतीचे गणित बिघडलेल्या बळीराजाला अवकाळी पावसानेआर्थिकदृष्ट्या खाईत नेऊन ठेवले आहे. शुक्रवारी (ता. ८)रात्री झालेल्या अवकाळी पावसाने परिसराला चांगलेच झोडपले. यात द्राक्ष, कांदा गहू, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील द्राक्ष आणि कांदा याला मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या मोठ्या संकटानंतर द्राक्ष आणि कांदा निर्यातीचा हंगाम सुरू झालेला असताना गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या नुकसानग्रस्त पिकांची आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करून या नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा जिल्हा संघटक दादा भामरे,दादाभाऊ सुर्यवंशी, सुधाकर पाटील,मोठाभाऊ सोनवणे,संजय सुर्यवंशी,शेखर मुळे,त्र्यंबक भामरे,सुभाष आहिरे आदि उपस्थित होते.




