Home नांदेड दुष्काळी अनुदान दोन टप्प्या ऐवजी एका टप्प्यात वाटप करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे...

दुष्काळी अनुदान दोन टप्प्या ऐवजी एका टप्प्यात वाटप करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिव शंकर पाटील कलंबर कर यांची

139
0

राजेंद्र पाटील राऊत

दुष्काळी अनुदान दोन टप्प्या ऐवजी एका टप्प्यात वाटप करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
युवा जिल्हाध्यक्ष शिव शंकर पाटील कलंबर कर यांची निवेदनाद्वारे मागणी.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यात सध्या दुष्काळी अनुदान वाटप करण्यात येत असून या दुष्काळी अनुदान वाटप दोन टप्पे ऐवजी एका टप्प्यात अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री शिव शंकर पाटील कलंबर कर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर करताना शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना सरसकट अनुदान हेक्टरी 25 हजार रुपयांची मागणी प्रतिहेक्‍टरी असताना शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रति हेक्‍टरी तुटपुंजी रक्कम मंजूर करून सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे त्यात एक हजार रुपयांची नुकसान भरपाई टक्केवारी कमी दाखवून त्यात पैसे कमी केले आहे. शेतकऱ्यावर जणू अन्याय केलेला आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांना एकरकमी अनुदान वाटप करताना बँकेला एक वर्षाचा कालावधी घेताहेत अनुदान वाटप करत असताना एक वर्षाचा कालावधी घेऊनही शेतकऱ्यांना बँकेचे चकरा माराव्या लागत आहेत. ही दुष्काळ अनुदान वाटप करण्यासाठी आता दोन वर्षे तरी लागतील असे सर्व शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया बोलली जात आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या अनुदान वाटप एक टप्प्यात द्या. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष श्री शिव शंकर पाटील कलंबर कर यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे नेवळी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक.
Next articleआरती बोराडे लिखित’बॉबीन या लघुपटाची अधिकृत घोषणा व पोस्टर उद्घाटन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here