Home नांदेड दादा भाऊ ताई काका म्हणून करत आहेत विनवणी . दिली जात आहे...

दादा भाऊ ताई काका म्हणून करत आहेत विनवणी . दिली जात आहे गावाकडे या उमेदवाराकडून मतदारांना हाक ..

89
0

राजेंद्र पाटील राऊत

दादा भाऊ ताई काका म्हणून करत आहेत विनवणी . दिली जात आहे गावाकडे या उमेदवाराकडून मतदारांना हाक ..
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार
युवा मराठा न्यूज नेटवर्क.
मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीसाठी 30 डिसेंबर रोजी3012 अर्ज प्राप्त झाले आहेत निवडणुकीसाठी नवीन वर्षात जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून दादाभाऊ ताई अण्णा काका गावाकडे या की हो अशी हाक दिली जात आहे 23 ते 30 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्र भरता येणार होते यात 24 26 27 डिसेंबर रोजी प्रशासकीय सुट्टी असल्याने उमेदवारांना चार दिवसात कागदपत्रांची जुळवाजुळव ऑनलाईन करण्यासाठी इंटरनेटच्या अडचणीमुळे इच्छुक उमेदवारांचा पूर्ण वेळ निघून गेला असल्याने अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसून आली ग्रामपंचायत निवडणुकीला आता चांगलाच वेग आला आहे पॅनमध्ये असणाऱ्या इच्छुकांनी निवडणुकीचा रणसंग्राम प्रारंभ होऊन बाहेरगावी गेलेल्या लोकांना फोन करत आहेत भाऊ दादा ताई गावाकडे कधी येणार अशी विचारणा सुरू केली आहे कोरोना च्या सुरुवातीला मात्र लोकडॉन काळात गावाबाहेर असणाऱ्या नागरिकांना गावातील लोकांनीच गावबंदी करून गावात येऊ न देण्याची भूमिका घेतली होती यामुळे पायी आलेल्या गावकऱ्यांनी नाहक त्रासाझाला सामोरे जावे लागले होते दुखावलेले ही मतदार गावचा रस्ता धरतील का ? असा प्रश्नही उपस्थित आहे

Previous articleइचलकरंजीत जुगार अड्यावर छापा २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Next article#श्रापित दोष आणि श्राद्ध पक्ष ..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here