राजेंद्र पाटील राऊत
कोळी कर्मचारी महासंघाच्या वतीने मिरेवाड यांचा सत्कार नायगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या नुकताच “माती शाबुत राहावी म्हणून” या काव्यसंग्रहाला पद्यगंधा फाउंडेशनचा अहमदनगर येथील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी मिरेवाड यांना अकोल्याच्या संकेत प्रकाशनचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि कवितासंग्रहाची विशेष गौरव म्हणून भि.ग. रोहमारे कोपरगाव या संस्थेनेही ही नोंद केली आहे. त्यांच्या या साहित्यिक चळवळीला बळ देण्यासाठी कोळी कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नांदेड जिल्हा कोळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष माधवराव रेडेवाड,दिलीप जेठेवाड, अशोक जेठेवाड, कृष्णा खानापूरकर ,उपक्रमशील शिक्षिका द्वारकाताई मेघनाळे,आणि हाणंमत वानोळे यावेळी उपस्थित होते. या पुरस्काराचे रोख रक्कम व सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.धोंडीराम वाडकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे मिरेवाड यांच्या कार्याचे अनेकजण कौतुक केले आहे. संजय,कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज देगलूर