Home सामाजिक मालेगाव शहरातील नव्याने बसवलेल्या सिग्नल मुळे वाहतुक सुरळीत

मालेगाव शहरातील नव्याने बसवलेल्या सिग्नल मुळे वाहतुक सुरळीत

89
0

Anshuraj Patil

मालेगाव शहरातील नव्याने बसवलेल्या सिग्नल मुळे वाहतुक सुरळीत

मालेगाव कँम्प : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव  शहरातील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नलमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन शिस्त लागण्यास मदत होईल, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केला , की शहरात नव्यानेच राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेमुळे वाहतूक व्यवस्थेवर सुरवातीला ताण पडेल. यातील अनुभवांनी पुढील काळात सुधारणा करता येतील. सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक पोलिसांबरोबर नागरिकांवरदेखील मोठी जबाबदारी राहणार आहे.नाशिक शहरातील प्रमुख चौकातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी रिंग रोड प्रस्तावित करण्याच्या सूचना या वेळी दिल्या.
शहरात प्रमुख सात ते आठ मुख्य रस्ते असून, त्यावर महापालिकेने लक्ष केंद्रित करावे. या रस्त्यांचा विकास करून नागरिकांना भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहराच्या विकासासाठी शासनस्तरावरून भरीव निधी मंजूर करून २०२१ हे वर्ष मालेगावच्या विकासाचे वर्ष ठरेल, असा विश्‍वास भुसे यांनी व्यक्त केला.
विकास निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने विशेष तरतूद करण्याचे आवाहन नगरसेवक बोरसे यांनी प्रास्ताविकात केले. श्री. पाटील, श्री. बिडकर, शान-ए-हिंद, युनूस इसा यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक ॲड. गिरीश बोरसे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या वाहतूक सिग्नलच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री भुसे बोलत होते. या वेळी उपमहापौर नीलेश आहेर, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, महापालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद निहाल अहमद, माजी महापौर हाजी युनूस इसा, सखाराम घोडके, मुस्तकीम डिग्निटी, भीमा भडांगे, नंदकुमार सावंत, एजाज बेग, शफीक अन्सारी, दीपाली वारुळे आदी उपस्थित होते.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleविज बिलाबाबत राज्य सरकार सकारात्मक, नामदार मुश्रीफ*
Next articleबंगला पहायचं शहीद संग्राम पाटील यांचे स्वप्न अपूर्णच
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here