Home माझं गाव माझं गा-हाणं शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून समजले जाणारे कापूस बोंड अळीमुळे कवडीमोल.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून समजले जाणारे कापूस बोंड अळीमुळे कवडीमोल.

176
0

Rajendra patil raut

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून समजले जाणारे कापूस बोंड अळीमुळे कवडीमोल.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
सततच्या पडणारा दुष्काळ आणि यात परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यातून शेतकरी अध्याप सावरला नाही हाती आलेल्या पिकालाही बाजारपेठेत भाव नाही त्यामुळे अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर बोंड आळी चे नवे संकट उभे राहिले आहे कापूस हे नगदी पीक समजले जाते या पिकावर शेतकऱ्यांचे बजेट अवलंबून असते परंतु बोंड आळी मुळे पांढरे सोने मातीमोल होत आहे सध्यास्थिती कापसा वरच्या उत्पादनखर्च निघणे अवघड झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे वास्तविक पाहता अनेक शेतकऱ्यांच्या वार्षिक ताळेबंद हा सोयाबीन व कापसाच्या उत्पादनावर अवलंबून असतो अनेक शेतकरी आपल्या संसाराचा घर गाडा चालवतात परंतु यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने सुरुवात करून देत खरिपातील मूग उडीद सोयाबीन पिके मातीमोल केली आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची उरलीसुरली मंदार कापूस पिकावर होती परंतु मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकावर बोंड आळी आक्रमण केले आहे या अळीचा सर्वाधिक फटका डोंगराळ भागात असलेला मुखेड तालुक्याला बसला आहे कापसाच्या उत्पन्नातून उत्पादन खर्च निघत नसल्याने पाहून हतबल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी अक्षरा उभ्या कापसाच्या पिकाला चरण्यासाठी जनावरे सोडले आहेत तर काही शेतकरी उभी कापणी कुठून टाकून देत आहेत अचानक आलेल्या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे यंदा बोंड आळी ने आक्रमण केल्याने च नोव्हेंबर महिन्यात पांढरा सोन्याची नासाडी झाली आहे यामुळे ऐन दिवाळीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे शासनाने शेतकऱ्यांच्या मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे

Previous articleएस.टि.प्रशासनाकडून, एस.टि.कर्मचाऱ्यांची उथळमाथ्याने स्लो पाॕयझन हत्या”
Next article🛑 कचरा समजून फेकले दागिने…! सफाई कर्मचार्‍यांने १८ टन कचऱ्यातून शोधून परत केले 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here