Home Breaking News *नांदेड जिल्ह्यातील सगळ्याच गावातील सुधारीत पैसेवारी जाहिर*

*नांदेड जिल्ह्यातील सगळ्याच गावातील सुधारीत पैसेवारी जाहिर*

118
0

*नांदेड जिल्ह्यातील सगळ्याच गावातील सुधारीत पैसेवारी जाहिर*
जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-नांदेड दिनांक ६ नोव्हेंबर. जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम २०२०-२१ या नावाची सुधारित पैसेवारी ५०पेक्षा च्या खाली जाहीर केली आहे. या जिल्ह्यातील सर्वच १५६२ गावांचा समावेश आहे. या पूर्वी नजर अंदाज पैसेवारी पन्नास पैसेवारी जाहीर झाली होती अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती सूत्रांनी दिली होती जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप हंगामाची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभाग व जिल्हा परिषद यंत्रणेतून करण्यात आलेल्या पीक पाहणी प्रयोगाच्या आधारावर जाहीर करते यात ३० ऑक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर केली जाते या पैसे वारीच्या निकषावर जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसानीचा तसेच उत्पादनाचा अंदाज धरला जातो. जिल्ह्यातील पेरणी वेळेवर झाल्या परंतु पेरणीनंतर पावसाने ओढ दिली यामुळे सोयाबीनची दोन-तीन वेळा पेरणी करावी लागली यानंतर सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे िल्ह्यातील पाच लाख ६४ हजार हेक्‍टरवरील खरीप पिक सह सह बागायती व फळ पिकांचे ते ३० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले याबाबत प्रशासनाने ३८५ कोटीची भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. दरम्यान यानंतर जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रशासनाच्या पैसेवारी कडे लक्ष लागले होते जिल्ह्यात १५६२महसुली गावात सात लाख८२ हजार८६७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती.

Previous article*पालकमंत्र्यांच्या हाती ट्रँक्टर स्टेअरिंग कोल्हापूरात काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रँक्टर रँली*
Next article*राज्यात २३ नोव्हेंबर पासुन शाळा सुरू होणार,* *शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here