Home Breaking News *मराठा आरक्षणावर राजकारण न कराता तोडागा काढण्याची गरज,*

*मराठा आरक्षणावर राजकारण न कराता तोडागा काढण्याची गरज,*

85
0

*मराठा आरक्षणावर राजकारण न कराता तोडागा काढण्याची गरज,*
*छत्रपती संभाजीराजे*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

राज्यात मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर राजकारण न करता सत्ताधरी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाचे रक्षण केले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. दोन्ही सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढला पाहिजे. मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये अशी विनंती देखील केली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन पंतप्रधानांना भेटणार का? या प्रश्नाला उत्तर देताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले , मराठा समाजाचा विषय संसदेत मी पहिल्यांदा मांडणारा मी पहिला खासदार आहे.
तसेच पंतप्रधानाना भेटण्याचे आवाहन सर्व खासदारांना देखील केले. सर्व पक्षांचे खासदार भेटण्यासाठी देखील तयार होते. परंतु पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला वेळ दिली नाही. परंतु त्यांनी आम्हाला वेळ देऊन समाजाच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे.
मुख्यमंत्री पदाविषयी ते म्हणाले, लोकशाहीत छत्रपतींचं नाव घेऊन कोणीही काम करू शकते. समाजसेवा करण्यासाठी मुख्यमंत्री पद कशाला हवे. समाजाला दिशा देण्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे.
संभाजीराजे म्हणाले की, समाजातील लोक आक्रमक होते, आम्ही तलवार काढलीय, तुम्ही आदेश द्या म्हणत होते, मी म्हणालो तुम्ही काही करू नका, गरज पडली तर मी आहे. समाजाला शांत करण्यासाठी मी तसं बोललो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे.

Previous article*कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार – डॉ. संजय ओक*
Next article*भरमसाठ व्याजाची रक्कम देण्यास नकार दिल्याने तरूणावर खूनी हल्ला*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here