Home Breaking News *युवा मराठा न्युजमुळे आदिवासी बांधवाना मिळाला अखेर न्याय* *

*युवा मराठा न्युजमुळे आदिवासी बांधवाना मिळाला अखेर न्याय* *

130
0

*युवा मराठा न्युजमुळे आदिवासी बांधवाना मिळाला अखेर न्याय*
*देवळा,(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-*
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या तिसगांव गावाजवळील श्रावणदेव वस्तीवर आज सकाळी एका आदिवासी इसमाचा मृत्यू झाल्याने,त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रयत्नातून वाद निर्माण झाल्याने व शेतकऱ्यांनी अंत्यविधी करु देणार नाही असा पावित्रा घेतल्याने,शेतकऱ्यामध्ये व आदिवासी बांधवामध्ये किरकोळ स्वरुपाचा शाब्दीक वाद झाला व धक्काबुक्कीची घटना घडली.
त्यामुळे श्रावणदेव वस्तीवरील आदिवासी बांधवानी युवा मराठा न्युजशी दुरध्वनीवरुन संपर्क साधल्याने,युवा मराठा न्युजच्या ब्युरो टिमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचे गांभिर्य पाहून संबंधित शेतकऱ्याशी चर्चा केली.यावेळी देवळ्याचे तहसीलदार दतात्रय शेजूळ यांचेशी युवा मराठा न्युजने दुरध्वनीवरुन संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली.अखेर सकाळी साडेदहा वाजेपासून रखडत पडलेल्या आदिवासी इसमाच्या मृतदेहावर युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्या प्रयत्नामुळे आज सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले,त्यामुळे श्रावणदेव आदिवासी वस्तीवरील आदिवासी बांधवानी युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचे भरभरुन कौतुक करुन अभिनंदन केले.वास्तविक तिसगांवच्या श्रावणदेव आदिवासी वस्तीवर सकाळी साडेदहा वाजल्यापासून आदिवासी इसमाच्या मृतदेहाची होत असलेली हेळसांड थांबवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिसगांवातील एकही पुढारी किंवा ग्रामपंचायतचे कुणीही पुढे आले नाहीत.त्यामुळे आदिवासी बांधवात तीव्र संतापाची भावना बघावयास मिळाली.

Previous article🛑 *राजगुरूनगरला मनसेचे ‘खळ्ळखट्याक’, कारण…*🛑
Next article*चेन्नई सुपरकिंग ने केले किशोर चे स्वप्न पूर्ण*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here