Home Breaking News *एस.टी.कामगारांच्या पगारसाठी* *मुंबईत बैठ घेणार .*

*एस.टी.कामगारांच्या पगारसाठी* *मुंबईत बैठ घेणार .*

423
0

*एस.टी.कामगारांच्या पगारसाठी* *मुंबईत बैठ घेणार .*

मोहन शिंदे (ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नासंदर्भात येत्या चार- पाच दिवसात मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्याची माहिती एसटीच्या संघटनेचे सचिव हनुमंत ताटे व केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
बारामतीत या दोघांनी आज पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाबाबत, तसेच त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा झाली असून, येत्या चार- पाच दिवसात याबाबत मुंबईत बैठकीचे आयोजन करणार असल्याची ग्वाही पवार यांनी दिल्याचे या दोन्ही नेत्यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी कामगारांच्या बिकट झालेल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष घालावे व एसटी महामंडळास दोन हजार कोटी आर्थिक साहाय्य करावे, यासाठी या आधीही मान्यताप्राप्त संघटनेने पत्र व्यवहार केलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटीवर अवलंबून कामगारांची संख्या व एसटीचे योगदान विचारात घेत राज्याच्या जीवनवाहिनीचे राज्य सरकारात विलीनीकरण करण्याबाबतही निवेदनात आग्रही मागणी करण्यात आली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले असल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर गवंडीकामासह, भाजीपाला विक्री करणे किंवा खासगी वाहनांवर चालक म्हणून जाण्याची पाळी आली आहे. अनेकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालण्याची या नेत्यांची मागणी होती. दरम्यान, अजित पवार यांनी या संदर्भात बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिलेली असल्याने हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा हनुमंत ताटे व संदीप शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleदोनदा आरक्षण घेता येणार नाही, राज्य सरकारकडून नव परिपत्रक ,मराठा समाजासह भाजपकडून कडाडून विरोध
Next article*कोरोनाने घेतला नगरसेवकाचा बळी.*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here