राज्यातील ग्रामीण पञकारांना प्रशासक म्हणून संधी उपलब्ध करून द्यावी – “पञकार संरक्षण समिती अध्यक्ष” विनोद पत्रे –
विशेष प्रतिनिधी ; राजेश एन भांगे
राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्राम पंचायतीची मुदत संपत असल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे . तसेच राजकीय लोकांना ही संघी पुन्हा मिळणार असून ग्रामीण पत्रकार सुद्धा गावातील सामान्य आणि या पदास पात्र व्यक्ती आहे. ग्रामीण भागातील पत्रकाराला गावातील सर्व प्रश्नांची चांगली जाणीव असते तसेच त्याचा जनसंपर्क ही दांडगा असतो. त्यामुळे ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून ग्रामीण भागातील पत्रकार उत्तम कामगिरी करू शकतो. म्हणून पत्रकाराला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी “पञकार संरक्षण समिती ” च्या वतीने मा. राज्यपाल व मा. मुख्यमंञी यांना करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून त्या – त्या गावातील ( भागातील ) ग्रामीण पत्रकाराची नेमणूक करावी अशी मागणी “पञकार संरक्षण समिती” कडून केली आहे.