Home Breaking News ग्रामपंचायत सरपंच होण्यासाठी सरकारतर्फे निवड प्रक्रिया जाहीर. ( प्रत्येक विधानसभा मतदार संघातील...

ग्रामपंचायत सरपंच होण्यासाठी सरकारतर्फे निवड प्रक्रिया जाहीर. ( प्रत्येक विधानसभा मतदार संघातील आमदार शिफारस करणार असून त्या व्यक्तीला जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणू नेमणार आहेत.) प्रतिनिधी =किरण अहिरराव

102
0

ग्रामपंचायत सरपंच होण्यासाठी सरकारतर्फे निवड प्रक्रिया जाहीर. ( प्रत्येक विधानसभा मतदार संघातील आमदार शिफारस करणार असून त्या व्यक्तीला जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणू नेमणार आहेत.)

प्रतिनिधी =किरण अहिरराव

( प्रत्येक विधानसभा मतदार संघातील आमदार शिफारस करणार असून त्या व्यक्तीला जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणू नेमणार आहेत.)
ग्रामपंचायत प्रशासक होण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर यापुढे प्रशासक म्हणून शासकीय अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार नसून त्याऐवजी गावातील योग्य व्यक्तीची निवड केली जाईल असा आदेश राज्यपाल यांनी पारित केला आहे.
यासंदर्भात सुधारित आदेश राज्याचे मुख्य अप्पर सचिवानी २५ जून रोजी निर्गमित केले आहे. राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर मध्ये संपत असून कोरोणामुळे उद्भवलेल्या परिस्थिती ने निवडणुका घेणे शक्य नसल्याने त्या ठिकाणी शासकीय प्रशासक नेमावा असे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले.
ग्रामपंचायत प्रशासक निवड प्रक्रिया
प्रत्येक विधानसभा मतदार संघातील आमदार शिफारस करणार असून त्या व्यक्तीला जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणू नेमणार आहेत. तसेच त्यासाठी जिल्हा परिषद सी ई ओ नेमणूक आदेश देणार आहे.
गावातील योग्य व्यक्तीची निवड करण्यासंदर्भातला आदेश निघताच अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून बहुतांशी ठिकाणी सरपंच मंडळी आपल्या कुटुंबातीलच प्रशासक कसा नेमला जाईल याची सुद्धा तयारी करत असल्याचे चित्र असून गावातील राजकीय व्यक्ती सुद्धा यात मागे नसून सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत प्रत्येक जण प्रशासक म्हणून आपली कशी वर्णी लागेल यासाठी फिल्डिंग लावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Previous articleनांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 6.27 मि.मी. पाऊसाची नोंद – नांदेड, दि. १५ ; राजेश एन भांगे
Next articleविधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार बाळासाहेब थोरात प्रतिनिधी= किरण अहिरराव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here