Home Breaking News कोकणातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार…! उद्योगमंत्री सुभाष देसाई ✍️कोकण (...

कोकणातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार…! उद्योगमंत्री सुभाष देसाई ✍️कोकण ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

115
0

🛑 कोकणातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार…! उद्योगमंत्री सुभाष देसाई 🛑
✍️कोकण ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत, याद्वारे कोकणातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केलं. कोकण उद्योग फोरमच्यावतीने ‘ग्रामीण उद्योगांतील संधी’ या विषयावरील वेबिनारमध्ये श्री. देसाई बोलत होते. मुंबई व परिसरात सुमारे दोनशे छोटे-मोठे उद्योजक यात सहभागी झाले होते.

उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून सध्या ७० हजार उद्योग झाले आहेत. त्याद्वारे सुमारे १६ लाख कामगार रुजू झाले आहेत. अलीकडेचे राज्य शासनाने काही परदेशी कंपन्यांसोबत २४ हजार कोटींचे सामजंस्य करार केले आहेत. यातील बरेच उद्योग हे कोकणात सुरू होणार आहेत. याद्वारे कोकणातील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत. त्याचा कोकणातील उद्योजकांनी लाभ घ्यावा, असही ते म्हणाले.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी ५०० कोटी रुपयांची तरदूत केलेली आहे. त्यातील बहुतांश हिस्सा कोकणासाठी राखीव ठेवला आहे. सेवा उद्योगासाठी दहा लाख तर मोठ्या भांडवलासाठी पन्नास लाखांपर्यंत कर्ज काढता येईल. या दोन्ही योजनांमध्ये केवळ १० टक्के हिस्सा उद्योजकांचा असेल. बाकीचे सर्व पैसे राज्य सरकार घालणार आहे. राज् शासनाने हमी घेतल्याने बँकांकडून विनातारण कर्ज मिळणार आहे. या योजनेत कोकणातील तरुणांना मोठी संधी आहे.
अन्न प्रक्रिया उद्योगाला राज्य सरकारने चालना दिली आहे. अन्न आणि फळ प्रक्रिया उद्योग केल्यास त्यासाठी प्रशिक्षण देण्याची शासनाने सोय केली आहे. नव्या उद्योजकांसाठी एमआय़डीसी तयार गाळे उपलब्ध करून देणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने तंत्रज्ञान क्षेत्रात अभिनव प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यांना इनोव्हेशन डिस्ट्रिकचा दर्जा दिला जातो. महाराष्ट्रातून रत्नागिरी जिल्ह्याचा यासाठी विचार करता येईल. याशिवाय रायगड जिल्ह्यातील नवीन एमआयडीसी मंजूर झाली आहे. य़ा ठिकाणी अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत. विशेषतः अभिनव असे फार्मा पार्क या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. कोकणातील पर्यंटन आणि हॉटेल व्यवसायला चालना दिली जाईल असे देसाई यांनी सांगितले….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here