Home सामाजिक …. प्रेरणादायी लेख….. योगायोग नव्हे, प्रेरणेचा संदेश २ ऑक्टोबरचे बहुविध पर्व

…. प्रेरणादायी लेख….. योगायोग नव्हे, प्रेरणेचा संदेश २ ऑक्टोबरचे बहुविध पर्व

108

आशाताई बच्छाव

1002022075.jpg

….. प्रेरणादायी लेख…..
योगायोग नव्हे, प्रेरणेचा संदेश
२ ऑक्टोबरचे बहुविध पर्व
धम्म, विजय, सत्य अहिंसा घेऊ ध्यास.
करुणा, समता,प्रामाणिकतेचा करू विश्वास,
शास्त्री – गांधीचा मार्ग धरू आपण सारे,
भारत उजळेल नवा, स्वप्न होईल खरे….
भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इतिहासात काही दिवस विशेष ठरतात. यावर्षीचा २ ऑक्टोबरचा दिवस हा एक विलक्षण संगम घेऊन येतो – धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा, महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती. एकाच दिवशी आलेला हा योगायोग हा केवळ कॅलेंडरचा खेळ नसून आपल्याला दिलेला प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन – समानता व करुणेचा धडा
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ साली” विजयादशमी दिवशी “धम्म दीक्षा घेतली व जगभराला करुणा, समता, बंधुता यांचा संदेश दिला. हा दिवस आपल्याला भेदभावमुक्त समाज घडविण्याची आठवण करून देतो. विद्यार्थी व समाजाने या दिवशी “मानवतेची भिंत” मजबूत करण्याचा निर्धार करावा.
दसरा – विजयादशमीचा उत्सव:-
दसरा म्हणजे सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर व प्रकाशाचा अंध:कारावर विजय. हा संदेश आजच्या काळात भ्रष्टाचार, अज्ञान, हिंसा यांसारख्या सामाजिक राक्षसांवर विजय मिळविण्यास प्रेरित करतो.
महात्मा गांधी जयंती – अहिंसा व सत्याचे शस्त्र:-
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जगाला दाखवले की सत्याग्रह व अहिंसा हीच सर्वांत मोठी शक्ती आहे. विद्यार्थ्यांसाठी गांधीजींचा संदेश म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा व आत्मबल. समाजासाठी त्यांचा संदेश म्हणजे – संघर्षांतही शांततेचा मार्ग निवडणे. शासन-प्रशासनासाठी गांधीजींचा आदर्श म्हणजे पारदर्शकता व जनतेच्या कल्याणाची बांधिलकी.
लाल बहादूर शास्त्री जयंती – साधेपणा व शौर्य
“जय जवान, जय किसान” या घोषवाक्याने शास्त्रीजींनी देशाला प्रेरित केले. शिस्त, संयम, प्रामाणिकपणा व साधेपणा ही त्यांची ओळख होती. शेतकरी व सैनिक या दोन स्तंभांवर देश उभा आहे हे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून परिश्रम व प्रामाणिकतेचे धडे घ्यावे.
या चार पर्वांचा सामूहिक संदेश
विद्यार्थ्यांसाठी : शिक्षणात प्रामाणिकपणा, परिश्रम, सत्य व अहिंसा अंगीकारा.
समाजासाठी : समता, करुणा, ऐक्य व सहिष्णुता या मूल्यांवर समाज उभारा.
शासन व प्रशासनासाठी :- जनतेसाठी पारदर्शक, जबाबदार व न्याय्य व्यवस्था उभी करा.
अपेक्षा:-
२ ऑक्टोबरचा हा योगायोग आपल्याला सांगतो की – धम्म, विजय, सत्य-अहिंसा व प्रामाणिकता या चार दिशांनी जर आपण चाललो, तर भारताला उज्ज्वल भविष्य नक्कीच गवसेल.
तथागतांचा संदेश करुणा,मैत्रीचा दीप,
डॉ.आंबेडकरांचा संकल्प समानतेचा रूप,
धम्मचक्र फिरुनी दिला नवा प्रकाश,
न्याय -अहिंसा घेऊन घडवू या इतिहास ….हीच अपेक्षा!
….. राहुल डोंगरे….
शिवाजी नगर,तुमसर. जि.भंडारा.
मो. न.9423413826

Previous articleदैनिक युवा मराठा चे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना साई जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Next articleसौ जयाताई निचित नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.