Home नांदेड सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी

सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी

180

आशाताई बच्छाव

1001699996.jpg

सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी
——-
शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड ः गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुवारी (दि. 10) येवती (लघु आळंदी)ता. मुखेड) येथे श्री प.पू.सद्गुरु नराश्याम महाराज यांच्या दर्शनासाठी व गुरुमंत्र घेण्यासाठी भाविकांचा सागर लोटला होता. यावेळी महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.

दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या दिवशी लघु आळंदी म्हणून ख्यातकिर्त असलेल्या येवती येथे श्री प.पू.सद्गुरु नराश्याम महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी मराठवाडा व कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यावेळी इच्छुक भाविकांना गुरुमंत्र देऊन दीक्षा दिली जाते. त्यासाठी भाविक लांबवरुन प्रवास करुन येत असतात.

मठ परिसरात अलीकडे चांगल्या पैकी भौतिक सुविधा झाल्याने भाविकांची सोय झाली आहे. यावर्षी सुद्धा गुरुवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्त पांडुरंग गोविंदराव यन्नावार पाळेकर, रा. देगलूर व भास्कर पाटील शिरूरकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. श्री.प.पू सद्गुरु नराश्याम महाराज यांनी सर्वांना दर्शन देत आशीर्वाद दिला व इच्छुक भविकांना गुरुमंत्र दिला. असंख्य तरुण भाविकांनी व्यवस्था अबाधित ठेवत भाविकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली.
गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Previous articleभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना.
Next articleमोबाईलमुळे जग जवळ आले, पण नाती दुरावली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.