आशाताई बच्छाव
जाहिर आभार व ऋणनिर्दश
मित्रानो , सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय! आज आपले आभार मानणे हि मी एक औपचारिकता समजत आहे.मला लहानपणापासून सामाजिक कार्याची मोठी आवड होती.म्हणूनच मी विविध पातळ्यांवर विविध ठिकाणी सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलो.पत्रकारितेच्या माध्यमातून माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने झाली.मी सामाजिक कार्य करताना कुठलाही जातीभेद बाळगला नाही.सर्वासाठी प्रामाणिकपणे लढत राहिलो,झटत राहिलो.अनेकांना न्याय मिळवून दिला.मथूरपाडे ता.मालेगाव येथील आदिवासी स्माशनभूमीचा प्रश्न सोडविला,तिसगाव ता.देवळा येथील श्रावण वस्तीवरील आदिवासी स्माशनभूमीचा प्रश्न सोडविला,जेजूरी ता.पुरंदर येथील जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करून न्याय मिळवून दिला,मनमाड येथील गरीब कुटूंबाचे बळकावलेले घरे सोडवून दिली,जेऊर ता.मालेगाव येथील पोलिस अन्यायाचे शिकार ठरलेल्या कुटूंबाला न्याय मिळवून दिला,झाडी ता.मालेगाव येथील दलित समाजाच्या शेती प्रश्नात न्याय मिळवून दिला,खाकुर्डी ता.मालेगाव गावी आदिवासी बांधवांच्या पिण्याचा पाणी प्रश्नसोडविला,भिलवाड मांगीतुंगी ता.सटाणा येथील आदिवासी समाजबांधवांच्या सुमारे अडीचशे नागरिकांना शेतीचा लाभ वनविभागाच्या वतीने मिळवून दिला,रोझे ता.मालेगाव येथील वादग्रस्त ग्रामसेविकेच्या बदलीसाठी संघर्ष करुन अखेर तेथून बदली केली,गिगाव ता.मालेगाव येथील रस्त्याचा प्रश्न आठ दिवसांत सोडवून नागरिकांना रस्ता उपलब्ध करून दिला, तिसगाव ता.देवळा येथील शेतीच्या नावाखाली लाखो रुपये हडपणा-या महिलेकडून पैसे वसूल करून दिले,माल्हणगाव ता.मालेगाव येथील आदिवासी महिलेस विनामूल्य शासकीय नोकरी मिळवून दिली,भिमखेत ता.सटाणा येथे कागदोपत्री असलेली अंगणवाडी पुन्हा नव्याने बांधण्यास भाग पाडले, कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पुरग्रस्तांना सुमारे दोन लाख रुपयांची मदत केली, जळगाव (नि) येथील निलंबित होणा-या नर्सला निलंबित होण्यापासून वाचवले,अशी एक ना अनेक कामे करीत असताना आयुष्यभर संघर्ष करीत आलो.व गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी लढत आलो.त्यामुळे माझ्या आयुष्यात अनेक मान सन्मानाचे योग आलेत.विविध पुरस्कार मिळालेत.आणि आता अगदी कालपरवा मला शिवहिंद समाजरत्न पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान आपण सगळ्यांनी आजपर्यंत मला दिलेल्या प्रोत्साहनामुळे लाभलेला आहे.अस म्हणतात जेथे पिकते तिथे विकले जात नाही.परंतू आज संपूर्ण महाराष्ट्रात एक स्वतः ची अशी खास ओळख निर्माण करण्यात मला माझा संघर्ष व सामाजिक कार्य अमुल्य ठरले आहे.आज रोजी युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलच्या माध्यमातून सक्रीय असलो तरी अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात युवा मराठा महासंघाचे कार्य सुरू आहे.शिवाय मालेगाव तालुक्यातील व-हाणे गावी आश्रयआशा फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून पाणपोई, वृक्षारोपण, महिला मेळावा, गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप,पुरस्कार सोहळा असे विविध समाजोपयोगी कार्य सुरू आहे.
आपण आपले कार्य करीत रहावे.विरोध करणारे करतील.जळणारे जळतील.पण आपण आपल्या ध्येयापासून विचलित होता काम नये.आज तिरस्कार करणारे कालपर्यंत आमच्याकडून कामे करुन घेण्यासाठी उंबरठा झिजवत होते.हे देखील बहुतांश जणांना माहिती आहे, तरीदेखील आपली बिकट वाट सुरळीत करण्यासाठी “तु चाल रं गडया, तुला भिती कुणाची पर्वा कुणाची “या न्यायाने अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहायचे.मला मिळालेल्या पुरस्कारांची दखल घेऊन आपण सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा रुपी आशिर्वादाचा मनःपूर्वक स्विकार..व आपल्या ऋणात राहूनच पुढील वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी कार्यरत राहिल याच ग्वाहीसह आपले सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष युवा मराठा महासंघ महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे