आशाताई बच्छाव
तिरंगा यात्रेमध्ये भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन
कोल्हापूर (अविनाश शेलार यांजकडून)
भारतीय सैन्यदलाप्रति कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसची तिरंगा यात्रा संपन्न झाली. या तिरंगा यात्रेमध्ये आदरणीय खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, राजूबाबा आवळे यांच्यासह आमदार सतेज पाटील सहभागी झाले होते
राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून सुरु झालेल्या या यात्रेमध्ये महापालिका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. या अत्यंत उत्साहपुर्ण या वातावरणात भारतमातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी जयघोष केला.
यावेळी जि. प. माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर, गोपाळ पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राहूल देसाई, शशांक बावचकर, राजू लाटकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, माजी नगरसेवक राहुल माने, मधुकर रामाणे, संजय मोहिते, ईश्वर परमार, दुर्वास कदम, तौफीक मुल्लाणी यांच्यासह विद्याधर गुरबे, विनायक घोरपडे, संदीप पाटील, संतोष पाटील अनंत पाटील, माजी सैनिक, एन. एन. पाटील, अशोक माळी, रघुनाथ पाटील, शशिकांत साळोखे, रत्नाकर शिरोळे, तानाजी चव्हाण, शिवाजी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका आणि जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.