आशाताई बच्छाव
गुगुळवाड पाणी आंदोलन
झोडगे प्रतिनिधी भाऊसाहेब निकम– गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव तालुक्यातील गुगुळवाड येथे, गिरणा धरण 26 गाव पाणी योजनेमार्फत महिन्यातून दोन किंवा तीन वेळेस पाणी येते. यासंदर्भात गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा तीव्र आंदोलने झालेली आहेत. फेब्रुवारी महिन्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.त्यावेळी नामदार भुसे साहेब यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक लावली होती. व अधिकाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मार्च संपला एप्रिल संपला मे महिना उजाडला तरीही कामाचा ठिकाणा नाही.नाईलाजास्तव शेवटचा पर्याय म्हणून येत्या मंगळवारी 13 मे रोजी जीवन प्राधिकरण च्या कार्यालयाला कुलूप ठोकायचा इशारा दिलेला आहे.
ह्या पार्श्वभूमीवर काल दिवसभर ठेकेदार कामावर फिरत होते, गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधिकारी आर डी निकम याच्याशी संपर्क करत होते. निकम यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, गावात येऊन लोकांचे समाधान करावे असे स्पष्टपणे सांगितल्याने. काल सायंकाळी जिल्हा अधीक्षक अभियंता श्री सचिन गोमासे व मालेगाव येथील उपअभियंता डी.आर. अलगट साहेब यांनी गावाला भेट दिली. कामाची पाहणी केली. यावेळी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाण्याबाबत लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. लोकांनी जंतू मिश्रित दूषित पाणी आणून अधिकाऱ्यांना दाखवले. 15 ते 20 दिवस पाणी येत नाही आम्ही काय करायचे. गरीब व आदिवासी लोकांनी एवढे पाणी कुठे साठवायचे. अनेक नळांना पाणीच येत नाही. पुरेशा दाबाने पाणी येत नाही. या वर्षाला कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. परिस्थिती नसताना प्रत्येकाला दहा-दहा हजार रुपयांच्या पाण्याच्या टाक्या घ्याव्या लागलेल्या आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयाची चावी नसल्याने शेवटी आर डी निकम यांच्या घरी बैठक झाली.जोपर्यंत काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांना गावातून बाहेर जाऊ द्यायचे नाही,किंबहुना घरातच कोंडून ठेवायचे असे ठरले. काहींनी दोन्ही अधिकाऱ्यांना साडी चोळी व बांगड्यांचा आहेर द्यावा असे सुचविले.
दोन्ही अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात तुमच्या टाकीवर पाणी पोहोचवतो अशी वारंवार ग्रामस्थांना विनंती केली.परंतु आता दिवस कमी राहिले पाऊस पडताच शेतात काम करता येणार नाही. मग काम कसे करणार व पाणी कसे देणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
जवळपास तीन तास झालेल्या या सर्व बैठकीत व चर्चेत उद्या दिनांक ८ में सकाळी आठ ते नऊ वाजेपासून काम सुरू होईल व पंधरा दिवसात काम पूर्ण होईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
शेवटी आजपासून काम सुरू होऊन सोमवार पर्यंत समाधानकार काम झाले तरच आंदोलन मागे घेण्यात येईल. नाहीतर मंगळवारी क्रांतिकारक व ऐतिहासिक आंदोलन करण्यात येईल असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. श्री गोमासे साहेब व अलगट साहेब यांनी ग्रामस्थांचे समाधान होईपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली रात्री उशिरापर्यंत थांबले. म्हणून दोन्ही अधिकाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानण्यात आले.मात्र मंगळवारच्या आंदोलनावर ठाम भूमिका घेण्यात आलेली आहे.
यावेळी आंदोलनाचा इशारा देणारे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आर.डी.निकम सरपंच संजय गाढवे, निंबा धवडे, विजय निकम,अनिल खोमणे,मिनाबाई निकम,मनीषा निकम सुभाबाई निकम, ज्ञानेश्वर निकम,नाना पवार,नानाभाऊ निकम, बापू महाले, यासह शेकडोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.