आशाताई बच्छाव
धुळे , संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ – नाशिक नंदुरबार व साक्री नंदुरबार सर्व राज्य परिवहनच्या बसेस ला टिटाणे फाटा हा थांबा करण्यात यावा असे पत्र साक्री आगार प्रमुखांना दिलेला आहे कारण टिटाणे फाट्याहून खोरी जामदे पेटले आंबेमोहर कु तर मारे नवागाव आणि इतर परिसर या संपूर्ण प्रवाशांना खूप मोठी समस्या आहे कारण जलद गाड्या थांबत नाहीत यासंदर्भात साक्री चे आमदार मंजुळाताई तुळशीराम गावित यांनी तसे पत्र साक्री आगार प्रमुखांना दिलेला आहे परंतु अद्याप त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही म्हणून या संदर्भात ग्रामपंचायतचे नेते सुभाष माळचे आणि गटनेते प्रशांत देवरे यांनी आगार प्रमुखांशी चर्चा करून आमदार ताईंनी दिलेल्या पत्रासंदर्भात काय कारवाई झाली याची माहिती घेतली चर्चा केली आणि त्यासंदर्भात आगार प्रमुखांनी सांगितले की आम्ही आगाराकडून पूर्ण कारवाई करून विभागीय आगार प्रमुख धुळे यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेला आहे आदेश आल्यावर पुढील विषय मार्गे लावता येईल आम्हाला धुळे विभागीय आगार प्रमुख यांच्याकडून उत्तर आलेले नाही जेव्हा आम्हाला त्यांचे मंजुरीचे आदेश मिळतील तेव्हा विषय मार्गी लावू असे सांगितले यावेळी उपस्थित प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.






