Home उतर महाराष्ट्र शिवसेना उभाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यात...

शिवसेना उभाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यात त्याचे तिव्र पडसाद

139
0

आशाताई बच्छाव

1001286353.jpg

श्रीरामपुर (दिपक कदम) शिवसेना उभाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यात त्याचे तिव्र पडसाद उमटले येथील शिवसेनेच्या वतीने शिर्डी लोकसभा,माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख नितीन औताडे, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप वाघ तालुका प्रमुख,राजश्री होवाळ, यांच्यासह शिवसेनेच्या (शिंदे गट) असंख्य कार्यकर्त्यांनी उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.

डॉ.नीलम गोऱ्हे शिवसेना उपनेते यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे,हे वक्तव्य म्हणजे केवळ नीलम गोऱ्हे नव्हे,तर संपूर्ण महिला भगिनींचा अपमान आहे,याच्या तीव्र निषेधार्थ शिवसेना वतीने श्रीरामपुर शहरात तीव्र निषेध जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना पदाधिकारी शुभम वाघ,जिल्हाप्रमुख युवासेना,उपजिल्हाप्रमुख शरद भणगे,राजेश तांबे उपजिल्हाप्रमुख,
विशाल शिरसाठ उपजिल्हाप्रमुख,युवासेना संदीप दातीर,तालुका प्रमुख युवासेना बाबासाहेब भालेराव,अनुसूचित जाती सेलचे तालुकाप्रमुख,शरद पवार ,लक्ष्मण पाचपिंड , उपतालुका प्रमुख,राहुल भंडारी, युवासेना शहरप्रमुख सत्तू महाराज,रवींद्र जाधव,देविदास सोनवणे,अण्णासाहेब कांदळकर,अजित कांदळकर, सविता वाडीले शहरप्रमुख महिला आघाडी,गोपाळे ताई,मोनाली जाधव,कविता वाघ,साधना प्रभू ,लता जगताप, कल्पना भोसले, गाडे ताई, शिवसेनेचे शहर व तालुका पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.विशाल रमेश शिरसाठ युवासेना उपजिल्हाप्रमुख आदी उपस्थित होते.

Previous articleप्राथमिक शिक्षण आपल्या उज्वल भविष्याचा पाया असतो.
Next articleप्रत्येक प्रांताची वेगळी बोलीभाषा असते
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here