Home गडचिरोली गडचिरोलीच्या जंगलातील रानटी हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करा

गडचिरोलीच्या जंगलातील रानटी हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करा

16
0

आशाताई बच्छाव

1000801751.jpg

गडचिरोलीच्या जंगलातील रानटी हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना नुकसानीची भरपाई देण्याची केली मागणी

२०-२५ हत्तींचा मोठा झुंड सेमाना वाकडी रस्त्यावर अचानक आल्याने लोकांमध्ये दहशत

वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली चर्चा
वनमंत्रांशी यासंदर्भात पुन्हा चर्चा करणार

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रानटी हत्तींनी प्रचंड धुडगूस घातला असून शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे जीवितहानीची ही शक्यता बळावलेली आहे करिता भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वनविभागाकडे केली आहे.

या रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे झालेले शेतीचे नुकसान त्यांचें पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची वनविभागाने व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या रानटी हत्ती मुळे सर्वसामान्य लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात लोकांचे जीव जाण्याची शक्यताही बळावलेली आहे. त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाने या संदर्भात तातडीने पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. करिता वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.

या संदर्भात आपण वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून वनमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेणार असल्याचे म्हणाले.

Previous articleआधुनिक युगामध्ये महिलांच्या कला गुणांना वाव मिळाल्यास महिलाही विविध क्षेत्रांमध्ये अव्वल ठरतील:—
Next articleकोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here