Home अकोला रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मूर्तिजापूरात शेतकरी आक्रोश मोर्चा

रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मूर्तिजापूरात शेतकरी आक्रोश मोर्चा

18
0

आशाताई बच्छाव

1000787925.jpg

रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मूर्तिजापूरात शेतकरी आक्रोश मोर्चा
हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मूर्तिजापूर दणाणले..!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
अकोला :- रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर येथे आज हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दहीहंडी फोडण्यात आली. हजारो शेतकऱ्यांनी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत अक्षरशः मूर्तीजापुर दणाणून सोडले होते. सोयाबीन-कापसाला भाव नाही. गेल्या वर्षीचा पिकविमा नाही, नुकसान भरपाई नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ आली आहे. तरीही सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागणी नसलेल्या योजनांवर सरकार पैसे खर्च करते, पण शेतकरी-कष्टकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा मूर्तिजापूर मध्ये आक्रोश पाहायला मिळाला. शेतकऱ्यांनी एकजुट दाखवत राजकीय वोट बँक तयार करणे गरजेचे आहे. तरच सरकार शेतकऱ्यांवर लक्ष देईल. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दहीहंडी फोडतील, असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी बोलतांना दिला.
यावेळी श्री.गजानन अहमदाबादकर, अमित अढाऊ, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सतीश ईडोळे, श्रीकांत ठाकरे, संजय सोनुने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तर मोर्चाचे यशस्वी आयोजन श्री.चंद्रशेखर गवळी, नितीन गावंडे, राहुल वानखेडे, रियाज शेख, नितीन खेडकर, निलेश घुलाने, शुभम जवंजाळ, रामदास भगत, अरुण धरमाळे यांच्या शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.

Previous articleभंडारा युनिटची पुन्हा धमाकेदार कारवाई 2024 या वर्षातील आठवी सापळा कारवाई यशस्वी
Next articleदोन व्यक्ती गेले वाहून ! -मृतदेह सापडला नाही! -नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करते तरी काय ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here