आशाताई बच्छाव
भगूर रेल्वे बोगदा नागरिकांना सद्या गैरसोईचा(सुदर्शन बर्वे )भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मभूमी असलेले भगूरचे मुख्य प्रवेशद्वार असलेला रेल्वेचा बोगदा त्या खालील पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटवावी व तेथे रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करून अंधाराचे साम्राज्य नष्ट करावे या बोगद्याकडून अनेक शाळकरी मुलांचा व ज्येष्ठ नागरिक कामगार वर्ग यांचा वावर असतो तसेच हा रस्ता भगूरच्या मुख्य बाजारपेठेला जोडणारा एकमेव रस्ता आहे तेथील समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अशी विनंती भनपा प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे वारंवार निवेदन देऊन ही कोणती ही कार्यवाही होत नाही, या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो, गाड्या चालवताना अनेक वेळा पाणी नागरिकांच्या अंगावर उडते त्याने अनेक वेळा वादविवाद ही होतात यावर लवकरात लवकर उपाययोजना झाली नाही तर तेथे जन आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा म.न.से.भगुर शहर उपाध्यक्ष श्री.श्याम देशमुख, भा.ज.पा. उपाध्यक्ष निलेश हासे, स्वच्छता व पर्यावरण दूत भ.न.पा.श्री.सुनील जोरे, राजू बलकवडे, श्री. प्रवीण वाघ व व्यापारी वर्गातर्फे देण्यात आला…