आशाताई बच्छाव
चाळीसगाव तालुक्यात अजून एक बालविवाह रोखला
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव तालुक्यात बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले असून पोलीसांच्या सतर्कतेने आणखी एक बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे. अवघ्या 13 वर्षे 14 महिने वय असलेल्या बालिकेचा विवाह लावून देण्याचा प्र्रयत्न रोखण्यात आला.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात 9 सप्टेंबर रोजी 13 वर्षे 10 महिने वय असलेल्या बालिकेचे लग्न लावणार असल्याची माहिती मिळाली असता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहूल राजपूत व पोना. संदीप माने यांच्यासह तालुका समन्वयक पूनम जगदाळे एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेरचे श्रीराम राठोड, कविता पालवे यांनी या मुलीच्या कुटुंबियास पोलीस ठाण्यात बोलावून बालविवाहामुळे होणारे नुकसान याविषयी त्यांचे समुपदेशन केले.
तसे समजपत्र बालीकेच्या आई-वडिलांना देण्यात आले.
यापुर्वीही 24 ऑगस्ट रोजी असाच होणारा बालविवाह रोखला होता. कायद्याने बालविवाहावर बंदी असली तरी काही मात्र लोक बाल विवाह लावून देत आहेत.हे यानिमीत्ताने समोर आले. अल्प वयात मुला-मुलीचा होणारा विवाह रोखल्याने टीमचे कौतुक होत आहे.