आशाताई बच्छाव
बालविवाह होण्यापासून रोखला, तालुका समन्वयक पुनम जगदाळे व श्रीराम राठोड यांचे अभिनंदन
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील-
बालविवाहावर
कायद्याने बंदी असली तरी काही लोक बालविवाह लावून देत आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील
एका गावात बालविवाह
होण्यापासून रोखला म्हणून
पुनम जगदाळे व श्रीराम
राठोड यांचे सर्वत्र अभिनंदन
होत आहे.
याबाबत माहिती अशी चाळीसगाव तालुक्यातील एका गावात दिनांक २४
ऑगस्ट २०२४ रोजी बालविवाह होत असल्याची गोपनीय
माहिती चाळीसगाव तालुका समन्वयक पुनम जगदाळे यांना मिळाल्यावर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण
पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक राहुल राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल
तुकाराम चव्हाण, श्रीराम
राठोड (एक्सेस टू जस्टिस
फॉर चिल्ड्रन, आधार
बहुउद्देशीय संस्था अमळनेर)
यांना सोबत घेवून त्या गावात विवाह ठिकाणी जावून
मुलगी व मुलाच्या परिवाराला चाळीसगाव ग्रामीण पोलीस
स्टेशन घेवून आले आणि आई-वडिलांना
समजपत्र देऊन व बालविवाहाचे होणारे नुकसान या संदर्भात समुपदेशन पुनम
जगदाळे व श्रीराम राठोड यांनी केले.
बालविवाह रोखणे ही काळाची गरज आहे मुलगी वयात आल्यावरच तिचे लग्न करा असे आवाहन पूनम जगदाळे यांनी केले आहे.